शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सात दिवसांत फाशीची अंमलबजावणी व्हावी; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 8:33 PM

निर्भया प्रकरणासारखा विलंब होऊ नये म्हणून गृह मंत्रालयाची याचिका

नवी दिल्ली: निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही दोषींकडून विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत फाशी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सात दिवसांत व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी गृह मंत्रालयानंसर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निर्भया प्रकरणातल्या दोषींनी पुनर्विचार, सुधारणा (क्युरेटिव्ह) आणि दया याचिका दाखल केल्यानं त्यांची शिक्षा लांबली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी गृह मंत्रालय प्रयत्नशील आहे. पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी एक मुदत निश्चित करण्यात यावी, अशी मागणी गृह मंत्रालयानं याचिकेच्या माध्यमातून केली आहे. 'न्यायालयानं डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी व्यक्तीला दया याचिका दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला जावा,' असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. दया याचिका फेटाळल्यानंतर सात दिवसांत डेथ वॉरंट जारी करण्याचे आदेश सर्व न्यायालयं, राज्य सरकारं, तुरुंग प्रशासनाला देण्यात यावेत आणि यानंतर सात दिवसांच्या आत दोषी व्यक्तीला फाशी देण्यात यावी. या दरम्यान दोषीची पुनर्विचार, क्युरेटिव्ह, दया याचिका कोणत्याही टप्प्यात असली तरी फाशीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी गृह मंत्रालयानं याचिकेतून केली आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNarendra Modiनरेंद्र मोदीHome Ministryगृह मंत्रालय