शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 02:06 IST

भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तात्पुरते बंद करण्यात आलेल्या ३२ विमानतळांवर नागरी उड्डाणे पुन्हा सुरू होतील

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तात्पुरते बंद करण्यात आलेल्या ३२ विमानतळांवर नागरी उड्डाणे पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सोमवारी केली. 

भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे ९ मे ते १५ मे पर्यंत स्थगित करण्यात आली होती. शनिवारी भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीस सहमती दर्शविली.

सोमवारी एका निवेदनात, सरकारी मालकीच्या एएआयने म्हटले आहे की १५ मे रोजी संध्याकाळी ५.२९ वाजेपर्यंत नागरी विमानांच्या ऑपरेशनसाठी बंद असलेली ३२ विमानतळे आता तत्काळ प्रभावाने ऑपरेशनसाठी उपलब्ध आहेत. प्रवाशांना विमान कंपन्यांकडून थेट उड्डाण संबंधित माहिती घेण्याचा आणि अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे विमान कंपन्यांच्या वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 

श्रीनगर विमानतळ उड्डाणांसाठी सज्ज 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ३२ विमानतळांवरून नागरी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणांसाठी सज्ज झाले आहे. श्रीनगर विमानतळ बंद झाल्यामुळे श्रीनगरहून हज उड्डाणांवरही परिणाम झाला. 

दिल्लीत वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता 

दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून सोमवारी सांगण्यात आले की, सध्या उड्डाणे सुरळीत सुरू आहेत. परंतु, बदलत्या हवाई परिस्थिती आणि वाढत्या सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. रविवारी दिल्ली विमानतळावरून सुमारे १०० विमाने रद्द करण्यात आली. 

चंडीगड विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू 

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर सोमवारी चंडीगड विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली. १२ मे २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून चंडीगड येथील शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा सुरू झाले आहे. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAirportविमानतळairplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकारJammu Kashmirजम्मू-काश्मीर