शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Coronavirus: तब्बल ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन; कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 15:35 IST

Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचं महत्त्वाचं पाऊल केंद्राकडून उचलण्यात आलंय. याबद्दलचे आदेश संबंधित राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून आलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य आणि प्रधान सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिवदेखील बैठकीला हजर होते. पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं यावेळी सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांनी पंतप्रधानांच्या सचिवांना सांगितलं. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.देशातल्या ७५ राज्यांमधील वाहतूक येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामध्ये आंतरराज्यीय वाहतुकीचाही समावेश आहे. अत्यावश्यक स्वरुपाच्या वाहतुकीला यामधून वगळण्यात आलंय. केंद्रानं लॉकडाऊनसाठी ७५ जिल्ह्यांची यादी तयार केलीय. या जिल्ह्यांच्या यादीत राज्य सरकारं गरजेनुसार आणखी राज्यांचा समावेश करू शकतात. काही राज्यांनी याआधीच लॉकडाऊन करण्याबद्दलचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राजस्थान आणि पंजाबचा समावेश आहे. पंजाब आतापर्यंत कोरोनाचे २६ रुग्ण आढळले असून राजस्थानात हाच आकडा १३ वर आहे. या राज्यांनी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झालीय. याआधी केंद्रानं रेल्वे वाहतूक बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. या काळात एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवादेखील बंद राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे