शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तब्बल ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन; कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 15:35 IST

Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचं महत्त्वाचं पाऊल केंद्राकडून उचलण्यात आलंय. याबद्दलचे आदेश संबंधित राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून आलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य आणि प्रधान सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिवदेखील बैठकीला हजर होते. पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं यावेळी सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांनी पंतप्रधानांच्या सचिवांना सांगितलं. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.देशातल्या ७५ राज्यांमधील वाहतूक येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामध्ये आंतरराज्यीय वाहतुकीचाही समावेश आहे. अत्यावश्यक स्वरुपाच्या वाहतुकीला यामधून वगळण्यात आलंय. केंद्रानं लॉकडाऊनसाठी ७५ जिल्ह्यांची यादी तयार केलीय. या जिल्ह्यांच्या यादीत राज्य सरकारं गरजेनुसार आणखी राज्यांचा समावेश करू शकतात. काही राज्यांनी याआधीच लॉकडाऊन करण्याबद्दलचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राजस्थान आणि पंजाबचा समावेश आहे. पंजाब आतापर्यंत कोरोनाचे २६ रुग्ण आढळले असून राजस्थानात हाच आकडा १३ वर आहे. या राज्यांनी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झालीय. याआधी केंद्रानं रेल्वे वाहतूक बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. या काळात एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवादेखील बंद राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे