शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
2
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
3
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
4
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
5
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
6
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
7
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
8
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
9
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
10
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
11
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
12
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
13
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
14
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
15
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
16
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
17
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
18
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
19
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
20
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

केंद्र सरकारने केला आसामी जनतेचा घात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 6:15 AM

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

मेघना ढोके

देशाला आमचा प्रश्नच कळलेला नाही. माध्यमे नागरिकत्व कायद्याचा प्रश्न हिंदू-मुस्लीम असा मांडत आहेत, पण आसाम व ईशान्य भारतासाठी विदेशातून आलेले, येणारे लोंढे हा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. नागरिकत्व कायद्याला आम्ही करो या मरो या वृत्तीने विरोध करू, आसाम कदापि बांगलादेशी लोंढ्यांना स्वीकारणार नाही, असं स्पष्ट मत आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुलकुमार महंतो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलं.

१९८०च्या दशकात आसाममध्ये तरुणांनी परप्रांतीय लोंढ्यांच्या विरोधात सहा वर्षे चालविलेल्या आंदोलनाचे महंतो नेते होते. आसाम करार हे या आंदोलनाचेच फलित. त्यातूनच महंतो यांची आसाम गण परिषद सत्तेत आली. आसामचे मसिहा अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र, नंतर ते भाजपसोबत गेल्याने त्यांच्यावर टीका खूप झाली. नागरिकत्व कायदाप्रश्नी त्यांनी आसामच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय?पूर्ण विरोध. शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू. आसामींच्या जगण्यावरच आक्रमण होणार असेल, आसामात आम्ही अल्पसंख्य होणार असू तर जगायचं कसं, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. बंगाली लोंढे लादणारा हा घातक कायदाआहे.देशभर एनआरसी करू, अशा घोषण होत आहेत. त्यातच नागरिकत्व दुरुस्ती कायदा...तेच दुर्दैव आहे, आसामींनी एनआरसी शांतपणे निभावली, पण नव्या कायद्याने केंद्र सरकार ती मोडीत काढतेय. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू बंगाली लादून आसामलाच ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे...पण पुढे काय?भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, हेच आता मोदी सरकार बदलायला निघाले असेल, तर आम्ही आसामी आणि ईशान्य भारतीय तरी त्याचा प्राणपणाने विरोध करू. आम्हाला कोणत्याच धर्माचे ‘बिदेशी’ लोक नकोत, आम्ही हे लोंढे अनेकदा स्वीकारले आणि पस्तावलो आहोत. यापुढे आसामसह ईशान्य भारतात जो काही असंतोष उसळेल आणि त्याचे जे परिणाम होतील त्यांना केवळ केंद्र सरकार जबाबदार असेल. आसामी माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा कुणी पाहू नये! आमची भाषा, संस्कृती, रोजगार व अस्तित्व यावरच हा घाला आहे. एनआरसीचा खेळ झाला, जो विषण्ण करणारा आहे.बांगलादेशातील हिंदू बंगाली लादून आसामला ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे. - प्रफुलकुमार महंतो 

टॅग्स :AssamआसामCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा