शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"तुम्ही ठोस कारवाई का केली नाही?"; १०० हून अधिक विमानांना धमक्या मिळाल्यानंतर भडकले केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:01 IST

विमानातील बॉम्बच्या धमक्यानंतर केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे.

Flight Bomb Threats : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या येत असताना, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब असल्याच्या अनेक फसव्या धमक्या या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन पसरवल्या जात होत्या. त्यानंतर संतापलेल्या केंद्र सरकारने एक्सच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. बॉम्बच्या धमक्यांमुळे विमान सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून कोट्यवधींचे नुकसान झालं आहे.

गेल्या काही दिवसांत १०० हून अधिक विमानांवर बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या धमक्यांमुळे विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने या विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या अधिकाऱ्यांना (पूर्वीचे ट्विटर) फटकारले आहे. तसेच अशा अफवांना सामोरे जाण्यासाठी ठोस कारवाई कारवाई का केली नाही असा सवाल देखील केला आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी बुधवारी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आणि एक्स, मेटा सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठक केली. या अध्यक्षस्थाथी असलेल्या भोंडवे यांनी एक्सवर नाराजी व्यक्त केली. तसेच सोशल मीडियावर या प्रकारच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही भोंडवे म्हणाले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी सोशल मीडिया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि हे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे कृत्य असल्याचे म्हटलं आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या देणाऱ्या खात्यांच्या युजर्सचा आयडी किंवा डोमेनचे तपशील मिळविण्यात दिल्ली पोलिस अयशस्वी झाल्यानंतर केंद्राने सोशल मिडिया कंपन्यांवर रोष व्यक्त केला. विमान कंपन्यांच्या दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांमुळे विमान कंपन्यांना सुमारे ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मंगळवारी देखील इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या ३० विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की या कालावधीत त्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क करून सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले. मात्र, आतापर्यंतच्या सर्व धमक्या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र यामुळे हजारो प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रचंड हाल झाले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडियाAir Indiaएअर इंडिया