शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

"तुम्ही ठोस कारवाई का केली नाही?"; १०० हून अधिक विमानांना धमक्या मिळाल्यानंतर भडकले केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:01 IST

विमानातील बॉम्बच्या धमक्यानंतर केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे.

Flight Bomb Threats : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या येत असताना, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब असल्याच्या अनेक फसव्या धमक्या या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन पसरवल्या जात होत्या. त्यानंतर संतापलेल्या केंद्र सरकारने एक्सच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. बॉम्बच्या धमक्यांमुळे विमान सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून कोट्यवधींचे नुकसान झालं आहे.

गेल्या काही दिवसांत १०० हून अधिक विमानांवर बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या धमक्यांमुळे विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने या विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या अधिकाऱ्यांना (पूर्वीचे ट्विटर) फटकारले आहे. तसेच अशा अफवांना सामोरे जाण्यासाठी ठोस कारवाई कारवाई का केली नाही असा सवाल देखील केला आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी बुधवारी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आणि एक्स, मेटा सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठक केली. या अध्यक्षस्थाथी असलेल्या भोंडवे यांनी एक्सवर नाराजी व्यक्त केली. तसेच सोशल मीडियावर या प्रकारच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही भोंडवे म्हणाले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी सोशल मीडिया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि हे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे कृत्य असल्याचे म्हटलं आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या देणाऱ्या खात्यांच्या युजर्सचा आयडी किंवा डोमेनचे तपशील मिळविण्यात दिल्ली पोलिस अयशस्वी झाल्यानंतर केंद्राने सोशल मिडिया कंपन्यांवर रोष व्यक्त केला. विमान कंपन्यांच्या दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांमुळे विमान कंपन्यांना सुमारे ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मंगळवारी देखील इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या ३० विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की या कालावधीत त्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क करून सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले. मात्र, आतापर्यंतच्या सर्व धमक्या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र यामुळे हजारो प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रचंड हाल झाले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडियाAir Indiaएअर इंडिया