शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 06:17 IST

Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे इतर देशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे मातरम मोहीम राबविली होती. अगदी त्याच धर्तीवर अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी आमचे प्रयत्न जारी आहेत, असेही ते म्हणाले.अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी सत्ता काबीज केली असून, त्यामुळे तिथे राहणारे विविध देशांतील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत जायचे आहे. केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे शिंदे यांनी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेस केंद्र सरकारने १३ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. मात्र गेल्या रविवारी विमान अफगाणिस्तानातील भारतीयांना घेऊन उड्डाण करणार होते, त्याच्या आधीच काबूल विमानतळावर गोळीबार झाला. त्यामुळे धोक्याची सूचना मिळाल्यामुळे हे उड्डाण त्यावेळी होऊ शकले नव्हते. तसेच काबूलची हवाई हद्दही त्यावेळी बंद करण्यात आली होती. 

एस. जयशंकर यांची गुटेरस यांच्याशी चर्चाअफगाणिस्तानातील स्थितीसंदर्भात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस व अन्य अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता बळकावली.  त्यामुळे त्या देशात गोंधळ माजला आहे,त्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान