शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:33 IST

सध्या मणिपूरमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे.

मणिपूरमध्ये आरक्षणावरून उसळलेला हिंसाचार काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ५० तुकड्या मणिपूरमध्ये पाठविण्यात येणार आहेत. जवळपास ५००० जवान मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. 

जिरिबाम जिल्ह्यात हिंसाचार भडकल्यानंतर आणि इतर भागात पसरल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानंतर गृह मंत्रालयाने (MHA) 20 अतिरिक्त CAPF कंपन्या, 15 CRPF आणि 5 BSF कंपन्या आधीच मणिपूरमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. परंतू, हे बळ तोकडे पडत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणखी मोठी कुमक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

या आठवड्यापर्यंत अतिरिक्त 50 कंपन्यांना मणिपूरला रवाना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 35 तुकड्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) कडून काढल्या जातील, तर उर्वरित तुकड्या सीमा सुरक्षा दल (BSF) कडून असतील, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले. 

सध्या मणिपूमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मणिपूरमधील स्थितीवर बैठक घेणार आहेत. यावेळी तेथील हिंसाचार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात यावर निर्णय घेतले जाणार आहेत. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार