शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘सीबीएसई’,‘आयसीएसई’ची १०वी-१२वीची राहिलेली परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 06:20 IST

राहिलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै या काळात घेण्याचा विचार होता. परंतु आता परीक्षा घेतलीच जाणार नाही.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची होत नसल्याने सीबीएसई व आयसीएसईने बारावीच्या राहिलेल्या विषयांची परीक्षा रद्द करण्याचे ठरविले आहे. कोरोनाचा फैलाव होण्याआधी ४० पैकी २९ विषयांची परीक्षा झाली होती. राहिलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै या काळात घेण्याचा विचार होता. परंतु आता परीक्षा घेतलीच जाणार नाही.कोरोनाची साथ कमी वाढत असल्याने परीक्षा घेऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. त्यावर न्या. अजय खानविलकर , न्या. दिनेश महेश्वरी व न्या. संजय खन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली, तेव्हा सीबीएसईच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंडळाचा वरील निर्णय कळविला. आयसीएसईही याचेच अनुकरण करेल, असे ज्येष्ठ वकील जयदीप गुप्तायांनी सांगितले.सीबीएसईच्या निर्णयाची माहिती देत मेहता म्हणाले की, बारावीच्या विद्यार्थ्यांना राहिलेल्या विषयांची परीक्षा देण्याची सक्ती असणार नाही. शाळांनी याच विषयाच्या आधी घेतलेल्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेतही गुण दिले जातील. ज्यांना हे गुणांकन पसंत नसेल त्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी आणखी एक परीक्षा देण्याची संधी मिळेल. ही परीक्षा परिस्थिती सामान्य झाल्यावरघेण्यात येईल. जे विद्यार्थी तो पर्याय स्वीकारतील, त्यांना त्या परीक्षेतील गुण अंतिम मानले जातील.>केंद्रच निर्णय घेईलमहाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांनी परीक्षा घेऊ देण्यास नकार दिला. त्यामुळे जे विद्यार्थी सरकारी गुण न स्वीकारता प्रत्यक्ष परीक्षेचा पर्याय स्वीकारतील त्यांची परीक्षा केव्हा घ्यायची, याचा निर्णय राज्यांऐवजी केंद्र सरकारच घेईल, असेही सॉलिसिटर जनरलंनी खंडपीठाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.>आज देणार माहितीआधीच्या तीन परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना किती गुण दिले गेले हे तसेच कामगिरी सुधारण्यासाठीची परीक्षा केव्हा होईल, हे १५ जुलैपूर्वी जाहीर केले जाईल. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सरासरी पद्धतीने दिलेले गुण ग्राह्य धरले जातील, असेही ते म्हणाले. दोन्ही मंडळांनी या बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे शुक्रवारी सादर कराव्यात म्हणजे याचिकांवर आदेश देता येतील, असे खंडपीठाने सांगितले.