शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांकडून सीबीआयला तपासाची मिळत नाही संमती; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 12:00 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१८ मधील एका प्रकरणात सीबीआयने ५४२ दिवसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात याचिका दाखल केली हाेती.

नवी दिल्ली : काही राज्ये सरकारे सीबीआयला आपल्या राज्यात तपासाची सरसकट संमती देत नसल्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंडसह ८ राज्यांनी सीबीआयला राज्याच्या हद्दीत विनापरवानगी तपास करण्याची परवानगी नाकारली आहे. या राज्यांकडे सीबीआयचे १५० विनंती अर्ज प्रलंबित आहेत. ही अपेक्षित परिस्थिती नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१८ मधील एका प्रकरणात सीबीआयने ५४२ दिवसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात याचिका दाखल केली हाेती. त्यानंतर काही मुद्दे उपस्थित झाले हाेते. सीबीआयने तपास केलेल्या प्रकरणात आराेप सिद्ध हाेण्याचे प्रमाण तसेच खटले लढणाऱ्या यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांची माहिती देण्यासंबंधी निर्देश देण्यात आले हाेते. त्यानुसार सीबीआयच्या संचालकांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले हाेते. त्यातून न्यायालयाने दाेन मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केली.  

पहिला मुद्दा म्हणजे, सीबीआयला तपासासाठी संमती न देण्याचा. भाजपाच्या विराेधात असलेल्या पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांनी सीबीआयला राज्याच्या हद्दीत तपास करण्यासाठी दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली हाेती. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थानसह ८ राज्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने वापर करण्यात येत असल्याचा आराेप या राज्यांनी केला हाेता. 

१५० विनंती अर्ज प्रलंबित 

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, केरळ आणि मिझाेरम या राज्यांना १५० अर्ज सीबीआयने २०१८ ते जून २०२१ या कालावधीत तपासाला परवानगी देण्यासाठी पाठविले आहेत. यापैकी ७८ प्रकरणे ही माेठ्या बँक घाेटाळ्यासंबंधी आहेत. प्रत्येक प्रकरणासाठी स्वतंत्र परवानगी मागावी लागत आहे. ही प्रक्रिया अतिशय वेळखाऊ असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.

आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे

सीबीआयने केलेल्या तपासांमध्ये आराेप सिद्ध हाेण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्के एवढे असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सीबीआयने सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग