शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राज्यांकडून सीबीआयला तपासाची मिळत नाही संमती; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 12:00 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१८ मधील एका प्रकरणात सीबीआयने ५४२ दिवसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात याचिका दाखल केली हाेती.

नवी दिल्ली : काही राज्ये सरकारे सीबीआयला आपल्या राज्यात तपासाची सरसकट संमती देत नसल्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंडसह ८ राज्यांनी सीबीआयला राज्याच्या हद्दीत विनापरवानगी तपास करण्याची परवानगी नाकारली आहे. या राज्यांकडे सीबीआयचे १५० विनंती अर्ज प्रलंबित आहेत. ही अपेक्षित परिस्थिती नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१८ मधील एका प्रकरणात सीबीआयने ५४२ दिवसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात याचिका दाखल केली हाेती. त्यानंतर काही मुद्दे उपस्थित झाले हाेते. सीबीआयने तपास केलेल्या प्रकरणात आराेप सिद्ध हाेण्याचे प्रमाण तसेच खटले लढणाऱ्या यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांची माहिती देण्यासंबंधी निर्देश देण्यात आले हाेते. त्यानुसार सीबीआयच्या संचालकांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले हाेते. त्यातून न्यायालयाने दाेन मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केली.  

पहिला मुद्दा म्हणजे, सीबीआयला तपासासाठी संमती न देण्याचा. भाजपाच्या विराेधात असलेल्या पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांनी सीबीआयला राज्याच्या हद्दीत तपास करण्यासाठी दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली हाेती. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थानसह ८ राज्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने वापर करण्यात येत असल्याचा आराेप या राज्यांनी केला हाेता. 

१५० विनंती अर्ज प्रलंबित 

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, केरळ आणि मिझाेरम या राज्यांना १५० अर्ज सीबीआयने २०१८ ते जून २०२१ या कालावधीत तपासाला परवानगी देण्यासाठी पाठविले आहेत. यापैकी ७८ प्रकरणे ही माेठ्या बँक घाेटाळ्यासंबंधी आहेत. प्रत्येक प्रकरणासाठी स्वतंत्र परवानगी मागावी लागत आहे. ही प्रक्रिया अतिशय वेळखाऊ असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.

आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे

सीबीआयने केलेल्या तपासांमध्ये आराेप सिद्ध हाेण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्के एवढे असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सीबीआयने सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग