शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

व्हॉट्सअ‍ॅप आदेशाद्वारे केली सीबीआय संचालकांची गच्छंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 06:28 IST

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना घरी बसवण्याचा आदेश मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पाठविण्यात आला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना घरी बसवण्याचा आदेश मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पाठविण्यात आला. पंतप्रधानांकडील कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे अधिकारी त्या रात्री ११.५५ वाजता वर्मा यांच्या निवासस्थानी गेले. परंतु, सुरक्षारक्षकांनी ‘साहेब झोपले आहेत’, असे सांगून पत्र स्वीकारले नाही. त्यामुळे हा आदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविण्यात आला.वर्मा यांना आदेश पोहोचेपर्यंत नागेश्वर राव यांना संचालकपदाची सूत्रे स्वीकारणे शक्य नव्हते. शिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि वर्मा यांच्या कार्यालयाची झडतीही घेता आली नसती. पंतप्रधान कार्यालयापासून ते राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपप्रधान सचिव पी.के. मिश्रा आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागातील अतिरिक्त सचिव लोक रंजन आपापल्या कार्यालयात सर्व काही मार्गी लागेल, अशी आशा बाळगून होते.अजित डोवल यांनी लोक रंजन यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून आदेश पाठविण्यास सांगितले. पण लोक रंजन यांच्याकडे तेव्हा मोबाइल फोन नसल्याने पीएमओने तो उपलब्ध करून दिला. आदेश पाठवल्यानंतर तो वर्मा यांनी वाचल्याची निळी खूण लोक रंजन यांनी पाहताच पुढच्या हालचालींना वेग आला.त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. आयबीच्या ८ अधिकाºयांच्या पथकाने सीबीआय मुख्यालय गाठून वर्मा आणि अस्थाना यांचे कार्यालय ताब्यात घेतले. वर्मा यांच्या अकराव्या मजल्यावरील कार्यालयाची झडती घेतली. तोवर नागेश्वर राव यांना त्यांच्या कक्षात थांबण्यास सांगण्यात आले होते. आयबीच्या पथकाने वर्मा यांच्या कार्यालयातील संगणकाची हार्ड डिस्क ताब्यात घेतली. तेथील सर्व फायलींच्या फोटोकॉपी काढल्या. उपधीक्षक अजय बस्सी यांच्याकडील सर्व फायलींच्या फोटोकॉपी काढल्या. सह-संचालक ए. के. शर्मा यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. आयबीचे पथक तेथून बाहेर पडेपर्यंत एकालाही तेथे येऊ दिले नाही.आयबीचे पथक काय शोधत होते, यामागचे गूढ कळले नाही. राफेल सौद्याच्या चौकशीच्या मुद्द्याची सरकारला फारशी चिंता नव्हती. राफेलशी संबंधित दस्तावेज आलोक वर्मा यांनी ए. के. शर्मा यांच्याकडे पाठविले होते. हे दस्तावेज प्रशांत भूषण यांनी सीबीआयला दिले होते.कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क ताब्यात घेतल्यावरून आयबीचे अधिकारी आणखी कशाचा तरी शोध घेत होते, हे निश्चित झाले. गुजरातच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी एस. के. शर्मा यांच्याकडील महत्त्वाचा विभाग काढून घेण्यात आला असा तरी त्यांना दिल्लीबाहेर पाठविालेले नाही, हे उल्लेखनीय. २७ वर्षांपासून राजीव गांधी हत्येप्रकरणी चौकशी करणाºया एमडीएमएचे प्रमुख म्हणून त्यांना कायम ठेवण्यात आले आहे. राकेश अस्थाना यांच्याऐवजी त्यांनी वर्मा यांची बाजू का घेतली, हे अद्याप गूढ आहे.>आयबीच्या अधिकाºयांची पाळतआलोक वर्मा यांना सक्तीने घरी बसवल्यानंतर आणि त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्न केंद्राकडून झाला, असे दिसते. हे नियमित काम आहे, असे अधिकारी सांगत असले तरी सीबीआय विरुद्ध सीबीआय संघर्षात आयबीच्या चार अधिकाºयांना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग