शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Cauvery Verdict :कर्नाटकवर 'कावेरी' प्रसन्न; तामिळनाडूला मिळणार कमी पाणी; सुप्रीम कोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 12:38 IST

कर्नाटकला 14.75 टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

नवी दिल्ली - तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि केंद्रशासित पाँडेचेरीदरम्यान गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या कावेरी पाणीवाटपाच्या वादावर सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी आपला निर्णय दिला आहे. तामिळनाडूला मिळणा-या पाण्यामध्ये कपात करत कर्नाटकला मिळणारा पाण्याचा वाटा कोर्टाकडून वाढण्यात आला आहे. बंगळुरू शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं कोर्टानं स्पष्ट केले आहे. 

कावेरी पाणीवाटपाबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी निर्णय दिला. पाणीवाटप लवादाच्या 2007 मधील निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. या लवादाने तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पाँडेचेरी यांच्या वाट्याचे पाणी ठरवून दिले होते. मात्र कर्नाटकने पाणी सोडण्यास नकार दिल्याने हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला. अखेर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी या प्रलंबित प्रकरणावर निर्णय देत कर्नाटकच्या वाट्याचे पाणी 14.75 टीएमसीने वाढवले आहे.

शिवाय,  'नदी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. एखाद्या राज्यातून उगम पावते म्हणून संबंधित राज्य त्या नदीच्या पाण्यावर पूर्णपणे हक्क सांगू शकत नाही,' असंही खंडपीठानं यावेळी नमूद केले.  कोर्टाच्या या निर्णयामुळे तामिळनाडूला मोठा झटका मिळाला आहे. कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे तामिळनाडून राज्य सरकारनं म्हटले आहे.  

137 वर्षांपासून सुरू असलेल्या कावेरी पाणीवाटपाच्या विवादावरुन कर्नाटक-तामिळनाडू आणि केरळ राज्य आमने-सामने उभे ठाकले आहेत. एआयएडीएमकेनं कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयासंबंधी पक्ष पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शिवाय, कर्नाटकहून तामिळनाडू येथून येणा-या बसेस सीमारेषेबाहेरच थांबवण्यात आल्या आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय