शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही! - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 16:42 IST

महिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे.

नवी दिल्लीः महिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे. कारण, लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही, असं थेट सर्वोच्च न्यायालयानेच सूचित केलं आहे. तुम्ही ज्या जातीत जन्माला येता, शेवटपर्यंत त्याच जातीचे राहता, असं स्पष्ट मत खंडपीठाने मांडलं आहे.

बुलंदशहरमधील एक महिला 21 वर्षांपूर्वी मागासवर्गीय कोट्यातून केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. परंतु, तिचा जन्म अग्रवाल कुटुंबात - अर्थात सर्वसाधारण प्रवर्गात झाल्याचं लक्षात घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. या निर्णयाला तिनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. आपला पती मागासवर्गीय समाजातील असल्यानं लग्नानंतर आपणही त्याच जातीच्या झालो आहोत, असं तिचं म्हणणं होतं. परंतु, न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम एम शंतनागौदर यांच्या खंडपीठाने तिचा हा दावा खोडून काढला. 

जन्माने जी जात तुम्हाला मिळाली आहे, ती अपरिवर्तनीय आहे. लग्नानंतरही त्यात बदल होत नाही, असं खंडपीठाने नमूद केलं. सदर महिला ही अग्रवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. मात्र, तिचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते?, असा प्रश्न करत खंडपीठाने तिची याचिका फेटाळली. 

दरम्यान, या महिलेला १९९१ मध्ये बुलंदशहर जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि जात प्रमाणपत्र याच्या आधारे या महिलेला मागासवर्गीयांच्या कोट्यातून १९९३मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील केंद्रीय विद्यालयात नोकरी मिळाली होती. या शाळेत शिक्षिका म्हणून काम करताना या महिलेने आपले 'एम.एड'ही पूर्ण केले. मात्र, तिने बेकायदेशीरपणे आरक्षणाचा फायदा घेतल्याचं समोर आल्यानंतर 2015 मध्ये तिचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं आणि केंद्रीय विद्यालयाने तिची नियुक्तीही रद्द केली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCaste certificateजात प्रमाणपत्र