शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मणिपूरमधील प्रकरण : ३०० जवानांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:32 AM

सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (अफ्स्पा)लागू असलेल्या भागात आॅपरेशन चालविल्याबद्दल सैन्याच्या ३००पेक्षा अधिक जवानांवर गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणात या जवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली -  सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (अफ्स्पा)लागू असलेल्या भागात आॅपरेशन चालविल्याबद्दल सैन्याच्या ३००पेक्षा अधिक जवानांवर गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणात या जवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २० आॅगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.अशांत क्षेत्रात कर्तव्य पार पाडणाऱ्या जवानांवर खटला चालविला जात आहे, असे मत अ‍ॅड. ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयात व्यक्त केले होते. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्र आणि न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या पीठाने विचारविनिमय केला. या याचिकेत म्हटले आहे की, गुन्हा दाखल करणे आणि सैन्याच्या जवानांवर खटला चालविणे अफ्स्पाच्या तरतुदींच्या विरुद्ध आहे. कारण, कर्तव्यावर असताना कारवाई केली तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यापासून सूट मिळालेली आहे. अशा खटल्यांमुळे सैन्य आणि निमलष्करी दलाचे मनोधैर्य कमी होईल, असेही या याचिकेत म्हटले आहे. मणिपूरसारख्या भागात कथित एन्काउंटर आणि कारवाईचा अतिरेक केल्याप्रकरणी सैन्याच्या जवानांवर खटला चालविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर काही खटले सुरू करण्यात आले आहेत.केंद्र, आसाम सरकारकडून न्यायालयाला हवा खुलासाआसाममध्ये सशस्त्र दले आणि पोलिसांकडून बनावट चकमकी केल्या जात असल्याचा आरोप करणाºया सार्वजनिक हित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि आसाम सरकारकडून उत्तर मागितले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnewsबातम्या