शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:46 IST

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील याचिका रद्द केली आहे.

Jaggi Vasudev Isha Foundation : दोन मुलींना ओलीस ठेवल्याप्रकरणी सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. कोइम्बतूर येथील ईशा फाऊंडेशन परिसरात आपल्या दोन मुलींना ओलीस ठेवल्याचा आरोप करत एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, दोन्ही मुली प्रौढ आहेत आणि त्यांनी स्वेच्छेने, कोणत्याही दबावाशिवाय आश्रमात राहत असल्याचे म्हटले आहे.

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ईशा फाऊंडेशनच्या आवारात आपल्या दोन मुलींना ओलीस ठेवल्याचा आरोप करणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी बंद केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाने अशा याचिकेवर चौकशीचे आदेश देणे योग्य नाही. पोलिसांनी आश्रमावर टाकलेला छापाही चुकीचा होता. दोन्ही मुली प्रौढ असल्याचे न्यायालयाने सांगितले. जेव्हा त्या आश्रमात गेल्या, तेव्हा दोघीही 27 आणि 24 वर्षांच्या होत्या. त्या स्वतःच्या इच्छेने आश्रमात राहत आहेत. या निर्णयाचा परिणाम या प्रकरणापुरता मर्यादित राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेनिवृत्त प्रोफेसर एस कामराज यांनी फाऊंडेशनच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कामराज यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेत आपल्या मुली लता आणि गीता यांना ईशा फाऊंडेशनच्या आश्रमात ओलिस ठेवण्यात आल्याचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने आश्रमाविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. मद्रास उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, पोलिसांनी ईशा फाऊंडेशनशी संबंधित सर्व गुन्हेगारी प्रकरणांचे तपशील सादर करावेत.

CJI दोन्ही मुलींशी बोलले दुसऱ्या दिवशी, म्हणजे 1 ऑक्टोबरला सुमारे 150 पोलिस तपासासाठी आश्रमात पोहोचले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर 3 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या फाउंडेशनविरुद्ध पोलिस तपासाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, या प्रकरणावर टिप्पणी करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दोन्ही तरुणींशी चर्चा केल्यानंतरच आदेश जाहीर केला. सरन्यायाधीशांशी चर्चेदरम्यान, मुलींनी आश्रमात स्वत:च्या इच्छेने राहत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Jaggi Vasudevजग्गी वासुदेवSupreme Courtसर्वोच्च न्यायालय