शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

गुगल मॅपने केला घात; अपूर्ण पुलावर कार गेली, खाली कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 19:43 IST

हा अपघात इतका भीषण होता की ग्रामस्थही चक्रावून गेले.

Bareilly News Today: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बरेली आणि बदाऊन जिल्ह्यांच्या सीमेवर भीषण रस्ता अपघात झाला. फरीदपूर-दातागंजला जोडणाऱ्या रामगंगा नदीवर नव्याने बांधलेल्या अपूर्ण पुलावरुन कार खाली कोसळली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (23 नोव्हेंबर) रात्रीची असल्याची माहिती आहे.

रविवारी (24 नोव्हेंबर) सकाळी खल्लापूर गावातील काही लोक रामगंगेच्या काठावर पोहोचले, तेव्हा हा अपघात उघडकीस आला. घटनास्थळी एक कार खड्ड्यात पडल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. गावकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर ते थक्क झाले. कारमधील तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.

गुगल मॅपने केला घातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील लोक गुगल मॅपच्या मदतीने दातागंजहून खल्लापूरमार्गे फरीदपूरला जात होते. गुगल मॅफने त्यांना पुलावर जाण्यास सांगितले, पण पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे कार खाली कोसळली. गाडी ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी होते, मात्र खड्ड्यात भरलेल्या पाण्यात रक्त पसरल्याने ते लाल झाले. अपघाताचे दृश्य इतके भीषण होते की, तेथे पोहोचलेले ग्रामस्थ चक्रावून गेले.

माहिती मिळताच फरीदपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. कौशल कुमार, विवेक कुमार आणि अमित कुमार, अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि एका लग्न समारंभातून घरी परतत होते. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू