शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंगांचं ठरलं! ‘ते’ ३ मोठे  ट्विट्स; भाजपला ऑफर, काँग्रेसला धक्का, सिद्धूंना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:52 IST

Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेली तीन ट्विट्स पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी ठरतील, असे सांगितले जात आहे.

चंदीगड: गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्याराजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमधील राजकीय घडामोडी काँग्रेससाठी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरू शकतात, अशी चर्चा आहे. यातच मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amarinder singh) यांनी मोठा निर्णय घेतला असून, नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यावेळी केलेली तीन ट्विट्स पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी ठरतील, असे सांगितले जात आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेसंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी करण्यात आलेली तीन ट्विट्स अतिशय महत्त्वाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पहिल्या ट्विटमध्ये नवीन पक्ष स्थापनेसंदर्भात माहिती दिली असून, दुसऱ्या ट्विटमध्ये भाजपसोबत युतीचे संकेत दिले आहेत. तर तिसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना कानपिचक्या दिल्या आहेत. अमरिंदर यांनी एकाच दगडात तीन पक्षी लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. 

पंजाबच्या राजकारणात ट्विस्ट आणणारी ट्विट्स

पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंजबाच्या भविष्यासाठीची लढाई सुरु झाली आहे. पंजाब आणि येथील लोकांच्या तसेच मागील वर्षभरापासून आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच नवीन पक्षाची घोषणा करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये गेल्या सुमारे १० महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करण्यात आले आहे. 

भाजपासोबत जागावाटप निश्चित करुन एकत्र निवडणूक लढवू

शेतकरी आंदोलनचा निकाल शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने लागला तर पंजाबमधील आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपासोबत जागावाटप निश्चित करुन एकत्र निवडणूक लढवू. तसेच आमच्यासारखी विचारसणी असणाऱ्या खास करुन दिंडसा आणि ब्रम्हपूरमधील अकाली गटांसोबत युतीचा विचार आहे, असे दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तर, तिसऱ्या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या नवज्योत सिंग सिद्धूंवर टीका केली आहे. 

पंजाबमधील शांतता आणि सुरक्षेसाठी नवीन पक्ष

आताच्या घडीला पंजाबमध्ये राजकीय स्थैर्य आणि अंतर्गत तसेच बाहेरुन असणाऱ्या धोक्यापासून संरक्षण हवे असल्याने पक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी प्रयत्न करेन, आता या दोन्ही गोष्टी येथे नाहीत, असे अमरिंदर सिंग यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपने अमरिंदर सिंग यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजपने अमरिंदर सिंग यांना पंजाबमधील सर्वांत मोठे नेते असल्याचे म्हटले आहे. तर सुखदेव सिंग दिंडसा यांनी अद्याप अमरिंदर सिंग यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही असे म्हटले आहे. सुखदेव हे शिरोमणी अकली दलचे (संयुक्त) अध्यक्ष आहेत. दुसरीकडे अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि खासदार परणीत कौर यांनी पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे समजते. 

टॅग्स :PoliticsराजकारणCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपा