शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

उमेदवाराने एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे - निवडणूक आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 10:28 AM

एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असं मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे

ठळक मुद्दे'एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये'निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर आपलं मत व्यक्त केलं आहेन्यायालयाने 13 ऑक्टोबरला निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं

नवी दिल्ली - एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असं मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे. आयोगाने सांगितलं आहे की, जेव्हा एखादा उमेदवार दोन्ही मतदारसंघातून निवडणूक जिंकतो तेव्हा त्याला एक जागा सोडत राजीनामा द्यावा लागतो. यामुळे त्या जागेवर पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी लागते. निवडणूक पुन्हा घ्यावी लागल्यामुळे निवडणुकीचा अतिरिक्त खर्च होतो. 2004 आणि 2016 मध्ये देखील यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. 

सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांना सांगितलं आहे की, त्यांनी यासंबंधी सहकार्य केलं पाहिजे. तीन आठवड्यानंतर याप्रकरणी सुनावणी करणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने 13 ऑक्टोबरला निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. न्यायालयात यासंबंधी एक याचिका दाखल करत आव्हान देण्यात आलं होतं. याचिकेतून संसद तसंच विधानसभासहित सर्व निवडणुकांमध्ये उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. 

भाजपा नेता आणि याचिकाकर्ता अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत सांगितलं आहे की, ज्याप्रमाणे एक मतदार एक मत तसंच एक उमेदवार एक जागा फॉर्म्यूला असला पाहिजे. लोकशाहीत एक उमेदवारी एकाच जागी निवडणूक लढवण्याचा नियम असला पाहिजे. दोन्ही जागांवर निवडणूक जिंकल्यानंतर एक जागा सोडावी लागते आणि पुन्हा निवडणूक झाल्याने सरकारी तिजोरीवर भार पडतो. त्यामुळे कायद्यानुसार हा नियम खोडून काढला गेला पाहिजे आणि असंवैधानिक घोषित केलं पाहिजे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय