शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, पाकिस्तान करतंय मदत; भारताचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 17:11 IST

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची पत्रकार परिषद

India Canada Rift: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढतच चालला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडाचा खरपूस समाचार घेतला.

"कॅनडाच्या भूमीवरील दहशतवादी कारवायांबाबत आम्ही त्यांच्याशी अत्यंत विशिष्ट माहिती शेअर केली आहे. पण कॅनडाने भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर केलेली नाही. कॅनडा हे दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करण्याची गरज आहे", असे बागची यांनी सुनावले.

बागची पुढे म्हणाले, "कॅनडाची व्हिसा सेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. कॅनडा सरकारचे सर्व आरोप राजकीय हेतुने प्रेरित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर न करण्याने त्यावर शिक्कामोर्तब होत आहे. आम्ही या प्रकरणावरील विशिष्ट माहितीबद्दल जागरूक राहू इच्छितो. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कॅनडा आणि पाकिस्तानकडून आर्थिक मदत आणि पाठबळ असलेला दहशतवाद. यावर तडजोड होणे शक्य नाही."

भारतीय दूतावास काम करू शकत नाही!

कॅनडातील व्हिसा सेवा बंद करण्याच्या निर्णयावरही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्टीकरणे दिले. "सर्वांना कॅनडामधील आमच्या उच्चायुक्तालये आणि वाणिज्य दूतावासांना भेडसावणाऱ्या धोक्यांची आणि सुरक्षा धोक्यांची जाणीव आहे. यामुळे त्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आमचे उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास तात्पुरते बंद आहेत, कारण प्रभावीपणे कार्य करण्यास ते अक्षम आहेत. आम्ही नियमितपणे याचे पुनरावलोकन करू."

 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद