शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सात लाख कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेला कॅबिनेटची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 20:33 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत महामार्गांचा विकास केला जाईल, तसंच जवळपास 83 हजार किमीपर्यंत रस्त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत महामार्गांचा विकास केला जाईल, तसंच जवळपास 83 हजार किमीपर्यंत रस्त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. यासाठी सात लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार असून 2002 पर्यंत हे काम पुर्ण करण्याचा निर्धार आहे. या योजनेत भारतमाला हायवे प्रोग्रामचा समावेश असून, यामध्ये देशांतर्गत सीमारेषेवरील परिसर जोडले जाणार आहेत.  

पुढील पाच वर्षात आर्थिक उलाढाल वाढवण्याचा यामागे हेतू आहे. महत्वाच्या कॉरिडोअर्समध्ये चार-पदरी रस्ते उभारत वाहतुकीचा वेग वाढवण्यावरही भर असणार आहे. विधानसभा निवडणुकांआधी सरकारने घेतलेला हा कदाचित सर्वात मोठा निर्णय आहे. 

रस्त्यांची खराब स्थिती तसंच अरुंद आणि अडचणीची ठिकाणं यामुळे भारतात एक ट्रक दिवसाला जास्तीत जास्त 250 ते 300 किमी अंतर पार करतो. विकसित देशांमध्ये हे अंतर 700 ते 800 किमी आहे. 'राष्ट्रीय महामार्ग विकास योजना रस्ते तयार करत असून, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठीही प्रयत्न करत आहोत. जेणेकरुन वाहतुकीचा खर्च कमी होईल. रस्त्यांचं चांगलं जाळं आणि स्मार्ट टॅग टोलिंगमुळे रस्ते वाहतूक क्षेत्रात चांगला बदल होईल', अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. 

मंत्रालयाच्या अंदाजानुसार, वर्षाला 10 हजार किमी रस्त्याचं बांधकाम केल्यास जवळपास चार कोटी लोकांना रोजगार मिळेल. विरोधकांकडून वारंवार सरकारकडून रोजगार निर्मिती होत नसल्याचा आरोप केला जातो. केंद्र सरकार विरोधकांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेचा वापर करु शकतं.  

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा