शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घ्या; केंद्रीय गृह मंत्रालयाची सर्व राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:53 IST

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेंंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित राज्यांना सूचना जारी सोशल मीडियातील चुकीच्या प्रचाराकडे लक्ष ठेवाहिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आसामापासून राजधानी दिल्लीपर्यंत अनेक भागात हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केली आहे. हिंसक आंदोलनाला रोखलं कसं जाईल यावर खबरदारी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकांची सुरक्षा अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे आदेश दिलेत. 

अमित शहांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहे. सोशल मीडियावर वरुन होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांवर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात सोशल मीडियात अनेक खोटी माहिती पसरविण्यासाठी केंद्र सरकारने जबाबदार धरलं आहे.

मात्र यापूर्वी भाजपाने पत्रकार परिषद घेत जामियासह देशभरात हिंसक आंदोलन भडकण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी राहुल गांधी, प्रकाश करात, डी. राजा असे लोक त्याठिकाणी गेले होते. पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रयत्न होताना दिसत आहे. शनिवारी राहुल गांधी यांची रॅली झाली. या रॅलीच्या माध्यमातून रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला अन् दुसऱ्याच दिवशी हिंसाचार वाढला. त्यामुळे या संपूर्ण हिंसक आंदोलनाच्या मागे काँग्रेसचा हात आहे असा आरोप भाजपाने केला आहे. त्याचसोबत राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लीम मतांसाठी उतरविले आहे. ओवैसी देशाचे नवे जिन्ना आहे असा आरोपही भाजपाने केला. दरम्यान, जामिया विश्वविद्यापीठातील युवकांना टॉयलेटमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. मुलींनाही मारहाण करण्यात आली.

आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलन होत होती. मात्र कॉलेज प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात प्रवेश करु शकत नव्हते. जर कुलगुरु आणि कॉलेज प्राचार्यांनी परवानगी दिली नाही तर दिल्ली पोलीस विद्यापीठात घुसले कसे? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे.  

त्याचसोबत माझ्याकडे जे व्हिडीओ आलेत त्यामध्ये विद्यार्थींनी आम्हाला वाचवा-वाचवा असे ओरडत होते. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील अन्य भागातही विद्यार्थी निदर्शने करतात. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोलकाता, सूरत, वाराणसी, बिहार, औरंगाबाद, कानपूर, मुंबई याठिकाणीही प्रदर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान मोदी सांगतात हे सर्व काँग्रेस पक्ष करतोय, जर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता. या आंदोलनाला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.  

टॅग्स :agitationआंदोलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकHome Ministryगृह मंत्रालयcongressकाँग्रेसBJPभाजपा