शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
4
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
5
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
6
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
7
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
8
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
9
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
10
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
11
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
12
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
13
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
14
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
15
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
16
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
17
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
18
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
19
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
20
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 09:57 IST

Citizen Amendment Act : जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

गुवाहाटी: भाजपचे केंद्रीय नेते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे कितीही जोरदार समर्थन करीत असले तरी आसाममधील भाजपचे काही नेते व आमदार या कायद्यावर नाराज आहेत. जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल जनतेच्या मनात असलेली भीती तसेच संशय दूर करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी भाजपच्या आमदारांनी सोनोवाल यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर भाजपचे आमदार पद्म हजारिका यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

हजारिका म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आसाममधील भाजप व त्याच्या नेत्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. ते मंत्री कोण यांची नावे सांगण्यास मात्र हजारिका यांनी नकार दिला.

आसामी भाषा, संस्कृती, लोकांची वांशिक ओळख यांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. या गोष्टी टिकून राहाण्यासाठी आसाम करारातील सहा व सातव्या कलमाची त्वरित अंमलबजावणी करावी असा आग्रह मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्र सरकारकडे धरावा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.

तणावपूर्ण शांततानागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात आसामसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यात हिंसाचारही झाला. त्यामुळे आसाममधील गुवाहाटीसह दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये बुधवारपासून तणावपूर्ण शांतता आहे. या कायद्याविरोधातील आंदोलनाचा ईशान्य भारतातील जोर अजूनही कमी झालेला नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसामBJPभाजपाMLAआमदार