शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 09:57 IST

Citizen Amendment Act : जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

गुवाहाटी: भाजपचे केंद्रीय नेते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे कितीही जोरदार समर्थन करीत असले तरी आसाममधील भाजपचे काही नेते व आमदार या कायद्यावर नाराज आहेत. जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल जनतेच्या मनात असलेली भीती तसेच संशय दूर करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी भाजपच्या आमदारांनी सोनोवाल यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर भाजपचे आमदार पद्म हजारिका यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

हजारिका म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आसाममधील भाजप व त्याच्या नेत्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. ते मंत्री कोण यांची नावे सांगण्यास मात्र हजारिका यांनी नकार दिला.

आसामी भाषा, संस्कृती, लोकांची वांशिक ओळख यांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. या गोष्टी टिकून राहाण्यासाठी आसाम करारातील सहा व सातव्या कलमाची त्वरित अंमलबजावणी करावी असा आग्रह मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्र सरकारकडे धरावा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.

तणावपूर्ण शांततानागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात आसामसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यात हिंसाचारही झाला. त्यामुळे आसाममधील गुवाहाटीसह दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये बुधवारपासून तणावपूर्ण शांतता आहे. या कायद्याविरोधातील आंदोलनाचा ईशान्य भारतातील जोर अजूनही कमी झालेला नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसामBJPभाजपाMLAआमदार