शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 09:01 IST

मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला ४२ टक्के, इंडिया आघाडीला ३८ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली - Survey On Loksabha Election ( Marathi News ) पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणित NDA आणि काँग्रेससह INDIA आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळेल. दोन्हीही आघाड्या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा दावा करत आहेत. त्यात लोक कुणाला साथ देतील हा खरा प्रश्न आहे. कुणाला किती जागा मिळणार? त्यावरून एक सर्व्हेसमोर आला आहे. त्यात एनडीएला ४० टक्के तर इंडिया आघाडीला ३५ टक्क्याहून अधिक मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ओपिनियन पोलनुसार, विरोधकांच्या इंडिया आघाडीला निवडणुकीत फटका बसू शकतो. भाजपा नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा तिसऱ्यांदा बहुमतात सरकार बनवू शकते. सर्व्हेत एनडीएच्या पारड्यात २९५ ते ३३५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १६५ ते २०५ जागांवर विजय मिळू शकतो. त्याशिवाय ३५ ते ६५ जागा इतरांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला ४२ टक्के, इंडिया आघाडीला ३८ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया आघाडीत कोणते पक्ष सहभागी?विरोधकांनी बनवलेल्या इंडिया आघाडीत प्रामुख्याने काँग्रेस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा टीएमसी, बिहारच्या नितीश कुमारांचा जेडीयू. डिएमके, आम आदमी पार्टी, आरजेडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांसह एकूण २८ पक्ष समाविष्ट आहेत. 

तर एनडीएमध्ये भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, जेडीएस यासह अन्य पक्ष आहेत. याशिवाय एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाडीत सहभागी नसलेले असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम, केसीआर यांची भारत राष्ट्र समिती पार्टी, टीडीपी, बीजेडीसह अन्य पक्ष आहेत. जर पुढील होणाऱ्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले तर देशात भाजपाची विजयाची हॅट्रीक होईल. मात्र लोक आपल्याला साथ देतील असा विश्वास इंडिया आघाडीच्या नेत्यांना आहे. 

महाराष्ट्रात कोणाचे पारडे जड?लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी