शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

काळाची झडप! कार-बाईकचा भीषण अपघात; लग्नाच्या 15 दिवस आधी वरासह 2 मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 11:31 AM

अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला.

नवी दिल्ली - राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील हिंदौली परिसरात कार आणि बाईकचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला. काळाने झडप घातली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. 

लग्नामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. जोरदार तयारी सुरू होती असं असताना कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील हिंडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काछी घाटीजवळ रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला. त्यावेळी प्रेमचंद कहार (25), प्रदीप कहार (17) आणि नितेश कहार (20) हे एकाच बाईकवरून जात होते. 

जयपूरहून कोटाकडे जाणाऱ्या कारला त्यांच्या बाईकची जोरदार धडक बसली. या अपघातात तीनही तरुण गंभीर जखमी झाले होते. हिंदौली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश बाबू यांनी ही माहिती दिली की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची परिस्थिती पाहता डॉक्टरांना त्यांना कोटा येथे पाठवले. 

कोटा येथे उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृतांमधील प्रेमचंद कहार याचे 15 मेला लग्न होणार होते. यांचसंदर्भात खरेदीसाठी तीनही जण हिंदौली येथे गेले होते. खरेदी झाल्यानंतर ते डोडूंदा येथे परतत होते. याचवेळी ही भीषण दुर्घटना घडली. प्रेमचंदच्या मृत्यूनंतर परिवारात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्न