शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

बजेटच्या दिवशी मतदारांचा मोदींना दणका, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिला 'विजयाचा हात'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 4:06 PM

गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना दोन राज्यातून आलेले लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. 

ठळक मुद्देब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर जनतेने 'हात' दिला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपली 'ममता' कायम ठेवली आहे.राजस्थानमध्ये अजमेर, अलवर या लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे

जयपूर - राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही राज्यात सर्वच जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये ब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर जनतेने 'हात' दिला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपली 'ममता' कायम ठेवली आहे. गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना राजस्थान आणि पश्चिम बंगालमधून आलेले निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. 

राजस्थानमध्ये अजमेर, अलवर या लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. अलवरमधून काँग्रेस उमेदवार करण सिंह यादव यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या जसवंत सिंह यादव यांचा पराभव केला. अजमेरमधून काँग्रेस उमेदवार रघु शर्मा यांनी भाजपाच्या राम स्वरुप लांबा यांचा पराभव केला. 

मांडलगड विधानसभेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीचा सामना झाला. इथून काँग्रेस उमेदवार विवेक धाकड यांनी भाजपाच्या शक्ति सिंह हाडाचा 12,976 मतांनी पराभव केला. राजस्थानात काँग्रेसची कमान सचिन पायलट यांच्या हाती होती. हे निकाल म्हणजे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण राजस्थानमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते.  

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलचा विजय उलुबेरिया लोकसभा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमदने बंपर विजयाची नोंद केली. नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमुल उमेदवार सुनील सिंह 1,11,729 मतांनी विजय मिळवला.

म्हणून पोटनिवडणूक राजस्थानातील खासदार सांवरलाल जाट यांच्या निधनामुळे अजमेरची जागा रिक्त झाली होती तर अलवरची जागा महंत चांदनाथ यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा