शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Budget 2022: अर्थव्यवस्थेलाही लसीकरणाची गरज, आर्थिक पाहणी अहवालातून बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 07:24 IST

Budget 2022: संसदेत सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले लसीकरण केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्था खुली करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : संसदेत सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले लसीकरण केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्था खुली करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.देशाच्या मोठ्या लोकसंख्येला कोरोना लस मिळणे देखील अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानुसार, देशातील ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. १६ जानेवारीपर्यंत देशभरात १५६ कोटींहून अधिक डोस देण्यात आले होते.

शिक्षण, खेळ, आरोग्यावर  ७१.६१ कोटी खर्च२०२१-२२ या आर्थिक वर्षात सामाजिक सेवा क्षेत्रावरील केंद्र आणि राज्य सरकारचा एकत्रित खर्च ७१.६१ लाख कोटी रुपये होता. २०२०-२१ च्या तुलनेत ही रक्कम ९.८ टक्के जास्त आहे. चालू आर्थिक वर्षात सामाजिक सेवांवर सरकारचा खर्च वाढला आहे. सामाजिक सेवांमध्ये शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृती, आरोग्य आणि औषध, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, गृहनिर्माण यासह विविध योजनांचा समावेश होतो. 

शिक्षणावर पडलेल्या परिणामांचे मूल्यांकन कठीणमहामारीच्या काळात वारंवार लॉकडाऊन आणि शिक्षण क्षेत्रावरील निर्बंधांच्या वास्तविक परिणामांचे मूल्यांकन करणे कठीण आहे. याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारकडे केवळ २०१९-२० चा डेटा उपलब्ध आहे. 

वाहन कंपन्यांचे उत्पादन घटलेजागतिक स्तरावर सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेमुळे, अनेक क्षेत्रातील कंपन्यांचे उत्पादन एकतर पूर्णपणे थांबले आहे किंवा कमी झाले आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन क्षेत्रासाठी ७६ हजार कोटी रुपये राखून ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशात त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. 

५जीच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरणदूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे ५जी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. कोरोना संकटात दूरसंचार क्षेत्राची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून, डेटा वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. - एअर इंडियाचे खासगीकरण केल्याने देशातील खासगीकरण मोहिमेला चालना मिळेल. सर्व क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी सर्वेक्षण करावे, असा सल्ला आर्थिक पाहणी अहवालामध्ये देण्यात आला आहे. 

मुक्त व्यापारावर भर निर्यातीमध्ये वैविध्य आणण्यासाठी, २०२१-२२ च्या आर्थिक आढाव्यात प्रस्तावित मुक्त व्यापार करारावर चालू असलेल्या वाटाघाटींना वेग देण्यावर भर देण्यात आला आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी भारत गेल्या अनेक वर्षांपासून वाटाघाटी करत आहे. 

पायाभूत सुविधांसाठी  १४०० अब्ज डॉलर हवेत२०२४-२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी, या कालावधीत पायाभूत सुविधांवर १ हजार ४०० अब्ज डॉलर खर्च करावे लागतील. २००८-१७ या आर्थिक वर्षांमध्ये भारताने पायाभूत सुविधांवर १,१०० अब्ज डॉलर खर्च केले आहेत. मात्र पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील ३ वर्षात १४०० अब्ज डॉलर उभे करण्यासाठी सरकारसमोर मोठे आव्हान राहणार आहे. सरकारला २०२४-२५ पर्यंत १११ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज आहे. 

इथेनॉलचा पुरवठा ३०२ कोटींपेक्षा अधिक! २०२०-२१ या वर्षात इथेनॉलचा पुरवठा ३०२ कोटी लिटरपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. २०१३-१४ मध्ये हा पुरवठा केवळ ३८ कोटी लिटर होता.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन