शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Budget 2022: अर्थव्यवस्थेलाही लसीकरणाची गरज, आर्थिक पाहणी अहवालातून बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 07:24 IST

Budget 2022: संसदेत सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले लसीकरण केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्था खुली करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : संसदेत सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले लसीकरण केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्था खुली करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.देशाच्या मोठ्या लोकसंख्येला कोरोना लस मिळणे देखील अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानुसार, देशातील ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. १६ जानेवारीपर्यंत देशभरात १५६ कोटींहून अधिक डोस देण्यात आले होते.

शिक्षण, खेळ, आरोग्यावर  ७१.६१ कोटी खर्च२०२१-२२ या आर्थिक वर्षात सामाजिक सेवा क्षेत्रावरील केंद्र आणि राज्य सरकारचा एकत्रित खर्च ७१.६१ लाख कोटी रुपये होता. २०२०-२१ च्या तुलनेत ही रक्कम ९.८ टक्के जास्त आहे. चालू आर्थिक वर्षात सामाजिक सेवांवर सरकारचा खर्च वाढला आहे. सामाजिक सेवांमध्ये शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृती, आरोग्य आणि औषध, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, गृहनिर्माण यासह विविध योजनांचा समावेश होतो. 

शिक्षणावर पडलेल्या परिणामांचे मूल्यांकन कठीणमहामारीच्या काळात वारंवार लॉकडाऊन आणि शिक्षण क्षेत्रावरील निर्बंधांच्या वास्तविक परिणामांचे मूल्यांकन करणे कठीण आहे. याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारकडे केवळ २०१९-२० चा डेटा उपलब्ध आहे. 

वाहन कंपन्यांचे उत्पादन घटलेजागतिक स्तरावर सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेमुळे, अनेक क्षेत्रातील कंपन्यांचे उत्पादन एकतर पूर्णपणे थांबले आहे किंवा कमी झाले आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन क्षेत्रासाठी ७६ हजार कोटी रुपये राखून ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशात त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. 

५जीच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरणदूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे ५जी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. कोरोना संकटात दूरसंचार क्षेत्राची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून, डेटा वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. - एअर इंडियाचे खासगीकरण केल्याने देशातील खासगीकरण मोहिमेला चालना मिळेल. सर्व क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी सर्वेक्षण करावे, असा सल्ला आर्थिक पाहणी अहवालामध्ये देण्यात आला आहे. 

मुक्त व्यापारावर भर निर्यातीमध्ये वैविध्य आणण्यासाठी, २०२१-२२ च्या आर्थिक आढाव्यात प्रस्तावित मुक्त व्यापार करारावर चालू असलेल्या वाटाघाटींना वेग देण्यावर भर देण्यात आला आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी भारत गेल्या अनेक वर्षांपासून वाटाघाटी करत आहे. 

पायाभूत सुविधांसाठी  १४०० अब्ज डॉलर हवेत२०२४-२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी, या कालावधीत पायाभूत सुविधांवर १ हजार ४०० अब्ज डॉलर खर्च करावे लागतील. २००८-१७ या आर्थिक वर्षांमध्ये भारताने पायाभूत सुविधांवर १,१०० अब्ज डॉलर खर्च केले आहेत. मात्र पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील ३ वर्षात १४०० अब्ज डॉलर उभे करण्यासाठी सरकारसमोर मोठे आव्हान राहणार आहे. सरकारला २०२४-२५ पर्यंत १११ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज आहे. 

इथेनॉलचा पुरवठा ३०२ कोटींपेक्षा अधिक! २०२०-२१ या वर्षात इथेनॉलचा पुरवठा ३०२ कोटी लिटरपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. २०१३-१४ मध्ये हा पुरवठा केवळ ३८ कोटी लिटर होता.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन