शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Budget 2020: आयओटी, फीनटेक आणि अ‍ॅनालिस्टिक्स; नव्या अर्थदिशा अर्थसंकल्पात प्रथमच नवतंत्रज्ञानाची दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 5:32 AM

‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’सारखी महत्त्वाकांक्षी योजना या नवतंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच प्रत्यक्षात येऊ शकली, याचा विशेष उल्लेखही त्यांनी केला.

मशीन रोबोटिक्स, बायो इन्फर्मेटिक्स, थ्री-डी प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या नवतंत्रज्ञानातल्या संकल्पना अर्थसंकल्पीय भाषणात ऐकण्याची अजिबातच सवय नसलेल्या जाणकारांना यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुखद धक्का दिला.

१५ ते ६५ वर्षे या ‘उत्पादक वयोगटा’तल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या देशात असणे आणि त्याचवेळी अवघ्या बाजारपेठेची पारंपरिक गृहीतके बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या नवतंत्रज्ञानाचे आगमन होणे; हा देशासाठी मोठा सुवर्णयोग असल्याचे नमूद करून सीतारामन यांनी या नवतंत्रज्ञानातून येऊ घातलेल्या भविष्यकालीन बदलांचे स्वागत करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सरकारी स्तरावरूनही आपली दारे उघडत असल्याचे संकेत दिले. ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’सारखी महत्त्वाकांक्षी योजना या नवतंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच प्रत्यक्षात येऊ शकली, याचा विशेष उल्लेखही त्यांनी केला.

पारंपरिक अर्थव्यवस्थेची प्रतिमाने बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या या नवतंत्रज्ञानाने जागतिक अर्थव्यवस्थेची नवी पटकथा लिहायला घेतली असल्याचे सीतारामन म्हणाल्या. ‘अ‍ॅनालिस्टिक्स, फीनटेक आणि इंटरनेट आॅफ थिंग्ज मुळे देशात होऊ घातलेल्या आमूलाग्र परिवर्तनाला चालना देण्यासाठी सीतारामन यांनी सहा सूत्री कार्यक्रमच जाहीर केला.

१. देशभरात डाटा सेंटर पार्क उभारण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.२. गावपातळीवरील महत्त्वाच्या अशा एकूण सहा व्यवस्था डिजिटल कव्हरेजच्या जाळ्याखाली एकत्रित आणणे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी शाळा, स्वस्त धान्य दुकाने, पोस्ट कार्यालये आणि पोलीस ठाणी या सर्वांना ‘फायबर टू होम’ व्यवस्थेने इंटरनेटशी जोडले जाईल. ‘भारत नेट’ या कार्यक्रमांतर्गत एकूण एक लाख ग्रामपंचायतींना डिजिटल जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 6000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.३. नवतंत्रज्ञानाच्या बहराच्या आणि विकासाच्या पार्श्वभूमीवर बौद्धिक हक्क संपदेचे जतन व्हावे, यासाठी विशेष केंद्राची निर्मिती.४. देशभरातील औद्योगिक वसाहतींमध्ये नवतंत्रज्ञानाची माहिती आणि प्रसारासाठी ‘नॉलेज ट्रान्सलेशन क्लस्टर्स’ची निर्मिती.५. भविष्यकाळात अधिक उन्नत होत जाणाऱ्या नवतंत्रज्ञानाच्या मदतीने देशामध्ये जेनेटिक मॅपिंगची तयारी करणे. आरोग्यसेवा, कृषी आणि जैवविविधता या क्षेत्रांमधील प्रयत्नांना तंत्रज्ञानाची बळकटी मिळावी आणि प्रयत्नांमध्ये अचूकता यावी यासाठी देशपातळीवर व्यापक डेटा-बेस तयार करणे. त्यासाठी दोन स्वतंत्र योजनांचा प्रारंभ लवकरच करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही सीतारामन यांनी केले.६. नवतंत्रज्ञानावर आधारलेल्या स्टार्ट-अप्समधील नवउद्यमींना प्रोत्साहन देण्याकडे सरकारचा कल असेल, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. या स्टार्ट-अप्ससाठी सीड फंड आणि प्रारंभिक भांडवल पुरवण्यात केंद्र सरकार पुढाकार घेईल.

क्वाण्टम मेकॅनिक्स

या नवतंत्रज्ञानाने संगणक, वाहतूक आणि सायबर सुरक्षेसारख्या अनेकानेक क्षेत्रांमध्ये नव्या संधींची दारे उघडली आहेत.क्वान्टम मेकॅनिक्सशी संबंधित एका राष्ट्रीय अभियानाची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली, एवढेच नव्हे तर या अभियानाच्या पहिल्यापाच वर्षांसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात केली.

टॅग्स :budget 2020बजेटbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन