शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

Budget 2019: भाजपा खासदारांकडून ‘मोदी, मोदी’च्या घोषणा; विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 05:27 IST

सत्ताधारी खासदार खुशीत निवडणुकांच्या तयारीसाठी अर्थसंकल्पाचा वापर

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प मांडणाऱ्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग व ग्रामीण जनतेला खूश करण्यासाठी अनेक घोषणांचा वर्षाव केला. प्राप्तिकरात सवलतीची मर्यादा ५ लाखांवर, पाच एकरांपर्यंतच्या अल्पभूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये व दरमहा १५ हजारांचे मासिक वेतन मिळवणाºया कामगाराला किमान ३ हजार रुपये पेन्शन अशा तीन प्रमुख घोषणा करून, २0१९ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडाच मोदी सरकारने ठरवून टाकला.मार्चमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर बजेटमधल्या यापैकी कोणत्याही घोषणेच्या अंमलबजावणीची जबाबदारी मोदी सरकारवर नाही. तथापि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आपले इरादे जाहीर करू शकते. त्याचा पुरेपूर वापर मोदी सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्पाद्वारे केला. अंतरिम अर्थसंकल्पात करविषयक प्रस्ताव वा कोणत्याही तरतुदींचा समावेश नसतो. नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत काही महिन्यांचा खर्च भागवण्यापुरते लेखानुदान सादर केले जाते. ज्याला संसदेची मंजुरी आवश्यक आहे अथवा प्रचलित कायद्यात काही बदल करावे लागणार आहेत असा कोणताही धोरणात्मक निर्णय त्यात नसतो. निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प नव्या सरकारतर्फे सादर केला जातो. त्यातच असे नवे बदल घोषित केले जातात. पण आपल्या राजकीय सोयीसाठी मोदी सरकारने ही परंपरा मोडून प्राप्तिकरात सवलती जाहीर केल्या.अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी देशातला मध्यमवर्ग, शेतकरी आणि कामगारांची नाराजी दूर करण्यासाठी ज्या काही योजना सादर केल्या, त्या प्रत्येक वेळी पंतप्रधान मोदी जोरजोरात बाके वाजवत होते. प्राप्तिकरात सूट देण्याची घोषणा होताच, सत्ताधारी बाकांवर चैतन्याचे भुईनळेच उसळले. सर्व भाजपा खासदार ‘मोदी, मोदी’च्या घोषणा देत बाके वाजवीत होते. विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया पसरली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चेहºयावरची अस्वस्थताही लपण्याजोगी नव्हती.750 कोटी गायींसाठीमोदी सरकारच्या काळात गाय मोठा मुद्दा ठरला आहे. गोपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय गोकुल मिशनसाठी ७५0 कोटींची तरतूद व राष्ट्रीय कामधेनू योजना जाहीर झाली, तेव्हा ग्रामीण भागातल्या सत्ताधारी खासदारांच्या चेहºयांवर समाधान होते.कृषी क्षेत्राच्या वाताहतीबद्दल मोदी सरकारवर खूप आरोप झाले. ते धुऊन काढण्यासाठी या अर्थसंकल्पाचा सरकारने वापर केला. शेतकºयांच्या कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आणताना, राहुल गांधींनी ‘निवडक उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे सूट बूट की सरकार’अशी टीका केली. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजारांचे अनुदान जमा करण्याचा डाव मोदी सरकार खेळले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व अनेक खासदारांनी ‘इलेक्शन बजेट’ असे अर्थसंकल्पाचे वर्णन केले आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019FarmerशेतकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयलcongressकाँग्रेस