शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Budget 2018: गावाकडे चला, शेतकरी-गरिबांना जपा;  'मिशन 2019' आधी मोदी सरकारचा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:01 IST

देशातील प्रमुख राज्यांमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी 'गावाकडे चला, बळीराजाला खुश करा, गरिबांना जपा', असाच काहीसा नारा मोदी सरकारनं दिला आहे.

नवी दिल्लीः देशातील प्रमुख राज्यांमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी 'गावाकडे चला, बळीराजाला खुश करा, गरिबांना जपा', असाच काहीसा नारा मोदी सरकारनं दिला आहे. करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत आणि टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल न करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदारांना निराश केलं, पण शेतकरी आणि गरीबांसाठी घोषणांचा पाऊस पाडला. या बजेटमध्ये 'राजा' बळीराजावर प्रसन्न होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी आधीच वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे.

शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्यांचा विषय लावून धरत विरोधकांनी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलंय. जसजशा निवडणुका जवळ येताहेत, तसतशी या विरोधाची धार अधिकाधिक तीव्र होतेय. तसंच, मोदी सरकारचा विकास शहरी भागापुरता आणि एका विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित असल्याची टीकाही होतेय. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्याचा त्यांना चांगलाच फटका बसला. ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपला नाकारल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अर्थसंकल्पात गावांच्या विकासावर भर, शेतकऱ्यांना दिलासा आणि गरीबांना आधार देणं मोदी सरकारसाठी अपरिहार्यच होतं. तेच त्यांनी केलं आहे. 

निवडणुका जवळ आल्यात म्हणून आम्ही लोकांना खुश करणाऱ्या घोषणा करणार नाही, अर्थव्यवस्थेला चालना देणारेच बजेट मांडू, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते. पण तरीही जेटलींच्या पोतडीतून आपल्या खिशात नक्कीच काहीतरी पडेल, अशी सगळ्यांनाच आशा होती. पण, त्यांनी हात फारच आखडता घेतला. एक तास 50 मिनिटं अर्थसंकल्पाचं वाचन करणारे जेटली जवळपास तासभर शेतकरी, गरीब, गावकरी यांच्याबद्दलच बोलले. 

* शेतकरी, गरीब, गावकऱ्यांसाठी बजेटमधील महत्त्वाच्या तरतुदीः 

>> शेती कर्जासाठी तब्बल ११ लाख कोटींची तरतूद

>> 'आयुषमान भारत' कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा फायदा ५० कोटी गरीबांना होणार, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी मिळणार ५ लाख रुपये... १२०० कोटी रुपयांची तरतूद 

>> तब्बल २७.५ दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन घेऊन आमच्या शेतकऱ्यांनी विक्रम केलाय. त्यांना उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

>> शेतीचा विकास 'क्लस्टर'प्रमाणे करण्याची गरज, महिला बचत गटांकडून नैसर्गिक शेती आणि त्यातील उत्पादनांचं मार्केटिंग करणार. कृषी आणि वाणिज्य विभाग हातात हात घालून काम करतील.

>> ४७० कृषी उत्पन्न बाजार समित्या इंटरनेटनं जोडण्यात आल्यात, इतरही जोडण्यात येत आहेत.

>> टोमॅटो, बटाट्यांचं प्रचंड उत्पादन हे सरकारपुढील आव्हान आहे. हे पदार्थ नाशिवंत आहेत. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केलीय. 

>> १०० अब्ज डॉलर्सचा शेतीमाल सध्या निर्यात केला जातो... त्यासाठी देशभरात ४२ फूड पार्क उभारली जाणारः

>> राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी रुपये

>> १० हजार कोटी रुपये मत्स्यधन आणि पशुधन विकासासाठी खर्च करणार

>> देशातील ८ कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार

>> पंतप्रधान सौभाग्य योजनेतून ४ कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देणार

>> येत्या वर्षात २ कोटी शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट

>> २०२२ पर्यंत गरिबांना हक्काचं घर देण्यासाठी ५१ लाख घरं बांधली... पुढच्या वर्षी आणखी ५१ लाख घरं बांधणार  

>> बचत गटांना ४२ हजार कोटींवरून ७५ हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय

>> ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि घरांसाठी १४.३४ लाख कोटी 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी