शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

Budget 2018: गावाकडे चला, शेतकरी-गरिबांना जपा;  'मिशन 2019' आधी मोदी सरकारचा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:01 IST

देशातील प्रमुख राज्यांमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी 'गावाकडे चला, बळीराजाला खुश करा, गरिबांना जपा', असाच काहीसा नारा मोदी सरकारनं दिला आहे.

नवी दिल्लीः देशातील प्रमुख राज्यांमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी 'गावाकडे चला, बळीराजाला खुश करा, गरिबांना जपा', असाच काहीसा नारा मोदी सरकारनं दिला आहे. करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत आणि टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल न करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदारांना निराश केलं, पण शेतकरी आणि गरीबांसाठी घोषणांचा पाऊस पाडला. या बजेटमध्ये 'राजा' बळीराजावर प्रसन्न होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी आधीच वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे.

शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्यांचा विषय लावून धरत विरोधकांनी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलंय. जसजशा निवडणुका जवळ येताहेत, तसतशी या विरोधाची धार अधिकाधिक तीव्र होतेय. तसंच, मोदी सरकारचा विकास शहरी भागापुरता आणि एका विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित असल्याची टीकाही होतेय. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्याचा त्यांना चांगलाच फटका बसला. ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपला नाकारल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अर्थसंकल्पात गावांच्या विकासावर भर, शेतकऱ्यांना दिलासा आणि गरीबांना आधार देणं मोदी सरकारसाठी अपरिहार्यच होतं. तेच त्यांनी केलं आहे. 

निवडणुका जवळ आल्यात म्हणून आम्ही लोकांना खुश करणाऱ्या घोषणा करणार नाही, अर्थव्यवस्थेला चालना देणारेच बजेट मांडू, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते. पण तरीही जेटलींच्या पोतडीतून आपल्या खिशात नक्कीच काहीतरी पडेल, अशी सगळ्यांनाच आशा होती. पण, त्यांनी हात फारच आखडता घेतला. एक तास 50 मिनिटं अर्थसंकल्पाचं वाचन करणारे जेटली जवळपास तासभर शेतकरी, गरीब, गावकरी यांच्याबद्दलच बोलले. 

* शेतकरी, गरीब, गावकऱ्यांसाठी बजेटमधील महत्त्वाच्या तरतुदीः 

>> शेती कर्जासाठी तब्बल ११ लाख कोटींची तरतूद

>> 'आयुषमान भारत' कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा फायदा ५० कोटी गरीबांना होणार, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी मिळणार ५ लाख रुपये... १२०० कोटी रुपयांची तरतूद 

>> तब्बल २७.५ दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन घेऊन आमच्या शेतकऱ्यांनी विक्रम केलाय. त्यांना उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

>> शेतीचा विकास 'क्लस्टर'प्रमाणे करण्याची गरज, महिला बचत गटांकडून नैसर्गिक शेती आणि त्यातील उत्पादनांचं मार्केटिंग करणार. कृषी आणि वाणिज्य विभाग हातात हात घालून काम करतील.

>> ४७० कृषी उत्पन्न बाजार समित्या इंटरनेटनं जोडण्यात आल्यात, इतरही जोडण्यात येत आहेत.

>> टोमॅटो, बटाट्यांचं प्रचंड उत्पादन हे सरकारपुढील आव्हान आहे. हे पदार्थ नाशिवंत आहेत. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केलीय. 

>> १०० अब्ज डॉलर्सचा शेतीमाल सध्या निर्यात केला जातो... त्यासाठी देशभरात ४२ फूड पार्क उभारली जाणारः

>> राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी रुपये

>> १० हजार कोटी रुपये मत्स्यधन आणि पशुधन विकासासाठी खर्च करणार

>> देशातील ८ कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार

>> पंतप्रधान सौभाग्य योजनेतून ४ कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देणार

>> येत्या वर्षात २ कोटी शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट

>> २०२२ पर्यंत गरिबांना हक्काचं घर देण्यासाठी ५१ लाख घरं बांधली... पुढच्या वर्षी आणखी ५१ लाख घरं बांधणार  

>> बचत गटांना ४२ हजार कोटींवरून ७५ हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय

>> ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि घरांसाठी १४.३४ लाख कोटी 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी