शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

बसपानं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन, घेतला मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात मायावतीनी उभं केलं आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 19:17 IST

Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे.

लोकसभा खासदारांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था निराशाजनक झाली होती. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. तसेच जागावाटपाता १७ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं असून, काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

बसपाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी याबाबत सांगितले की, बसपा अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार उतरणार आहे. आम्ही आधीही या मतदारसंघात उमेदवार उतरवत होतो. तसेच यावेळी आम्ही काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या या मतदारसंघांमधून उमेदवार उतरवणार आहोत. दरम्यान, मायावती सच्चिदानंद पांडेय यांना अयोध्येमधून उमेदवार बनवतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, याबाबत बसपाप्रमुखांकडून ज्या सूचना येतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

सच्चिदानंद पांडेय यांनी हल्लीच भाजपाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते बसपाच्या तिकिटावर अयोध्येमधून निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. अयोध्येतून ब्राह्मण उमेदवार का उतरवणार असं विचारलं असता विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, बसपा सर्व समाजाच्या सहभागाची भूमिका मांडत असते. जर पांडेय यांना उमेदवार बनवलं ती काही फार मोठी बाब नसेल.

हा देश विविध धर्मांचा देश आहे. राजकारणात धर्माला आणता कामा नये. माझ्या मते देशाचा विकास कसा होईल. बंधुत्व कसं वाढेल. रोजगार कसा मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, या मुद्द्यांवरून मतदान झालं पाहिजे. तसेच यावेळी तसं मतदान होईल. बसपाप्रमुखांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. समाजाची आघाडी हीच सर्वात मोठी आघाडी असते. त्यासमोर कुणाचं काही चालत नाही. आम्ही आघाडी करणार असल्याचा चर्चा बिनबुडाच्या आहेत. आम्ही अमेठी आणि रायबरेलीमधूनही उमेदवार उतरवणार आहोत, असेही विश्वनाथ पाल यांनी सांगितले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस