शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बसपानं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन, घेतला मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात मायावतीनी उभं केलं आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 19:17 IST

Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे.

लोकसभा खासदारांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था निराशाजनक झाली होती. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. तसेच जागावाटपाता १७ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं असून, काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

बसपाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी याबाबत सांगितले की, बसपा अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार उतरणार आहे. आम्ही आधीही या मतदारसंघात उमेदवार उतरवत होतो. तसेच यावेळी आम्ही काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या या मतदारसंघांमधून उमेदवार उतरवणार आहोत. दरम्यान, मायावती सच्चिदानंद पांडेय यांना अयोध्येमधून उमेदवार बनवतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, याबाबत बसपाप्रमुखांकडून ज्या सूचना येतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

सच्चिदानंद पांडेय यांनी हल्लीच भाजपाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते बसपाच्या तिकिटावर अयोध्येमधून निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. अयोध्येतून ब्राह्मण उमेदवार का उतरवणार असं विचारलं असता विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, बसपा सर्व समाजाच्या सहभागाची भूमिका मांडत असते. जर पांडेय यांना उमेदवार बनवलं ती काही फार मोठी बाब नसेल.

हा देश विविध धर्मांचा देश आहे. राजकारणात धर्माला आणता कामा नये. माझ्या मते देशाचा विकास कसा होईल. बंधुत्व कसं वाढेल. रोजगार कसा मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, या मुद्द्यांवरून मतदान झालं पाहिजे. तसेच यावेळी तसं मतदान होईल. बसपाप्रमुखांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. समाजाची आघाडी हीच सर्वात मोठी आघाडी असते. त्यासमोर कुणाचं काही चालत नाही. आम्ही आघाडी करणार असल्याचा चर्चा बिनबुडाच्या आहेत. आम्ही अमेठी आणि रायबरेलीमधूनही उमेदवार उतरवणार आहोत, असेही विश्वनाथ पाल यांनी सांगितले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस