शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बसपानं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन, घेतला मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात मायावतीनी उभं केलं आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 19:17 IST

Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे.

लोकसभा खासदारांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था निराशाजनक झाली होती. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. तसेच जागावाटपाता १७ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं असून, काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

बसपाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी याबाबत सांगितले की, बसपा अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार उतरणार आहे. आम्ही आधीही या मतदारसंघात उमेदवार उतरवत होतो. तसेच यावेळी आम्ही काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या या मतदारसंघांमधून उमेदवार उतरवणार आहोत. दरम्यान, मायावती सच्चिदानंद पांडेय यांना अयोध्येमधून उमेदवार बनवतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, याबाबत बसपाप्रमुखांकडून ज्या सूचना येतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

सच्चिदानंद पांडेय यांनी हल्लीच भाजपाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते बसपाच्या तिकिटावर अयोध्येमधून निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. अयोध्येतून ब्राह्मण उमेदवार का उतरवणार असं विचारलं असता विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, बसपा सर्व समाजाच्या सहभागाची भूमिका मांडत असते. जर पांडेय यांना उमेदवार बनवलं ती काही फार मोठी बाब नसेल.

हा देश विविध धर्मांचा देश आहे. राजकारणात धर्माला आणता कामा नये. माझ्या मते देशाचा विकास कसा होईल. बंधुत्व कसं वाढेल. रोजगार कसा मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, या मुद्द्यांवरून मतदान झालं पाहिजे. तसेच यावेळी तसं मतदान होईल. बसपाप्रमुखांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. समाजाची आघाडी हीच सर्वात मोठी आघाडी असते. त्यासमोर कुणाचं काही चालत नाही. आम्ही आघाडी करणार असल्याचा चर्चा बिनबुडाच्या आहेत. आम्ही अमेठी आणि रायबरेलीमधूनही उमेदवार उतरवणार आहोत, असेही विश्वनाथ पाल यांनी सांगितले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस