शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खळबळजनक! "काठ्या घेऊन रॅलीत या"; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरल

By देवेश फडके | Updated: January 27, 2021 12:34 IST

दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा हिंसाचार झालेला पाहायला मिळाला. या हिंसाचारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरललाठ्या-काठ्या घेऊन रॅलीत येण्याचे सांगत असल्याचे उघडहिंसाचारात सामील असणाऱ्यांवर कारवाई करणार - राकेश टिकैत

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा हिंसाचार झालेला पाहायला मिळाला. या हिंसाचारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात राकेत टिकैत शेतकऱ्यांना लाठ्या-काठ्या घेऊन रॅलीत येण्यास सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली असून, राकेश टिकैत शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप केला जात आहे. 

राकेश टिकैत काय म्हणाले?

या व्हिडिओमध्ये राकेश टिकैत म्हणाले की, सरकार काही झाले तरी ऐकत नाही. आडमुठेपणा करत आहे. आपला झेंडा घेऊन या. झेंडाही आणायचा आहे. लाठ्या-काठ्याही आणायच्या आहेत. सर्व गोष्टी समजून जा. तिरंगाही लावायचा आहे, आपला झेंडाही लावायचा आहे. आता सर्वांनी यायचे आहे. आपल्या जमिनी वाचत नाही. आपल्या जमिनी वाचवायचा सर्वांनी या. अन्यथा जमिनी वाचणार नाहीत. जमिनी हिसकावून घेतल्या जातील, असे राकेश टिकैत या व्हिडिओमध्ये सांगताना पाहायला मिळत आहेत. 

काठ्या शस्त्र नाहीत - राकेश टिकैत

राकेश टिकैत यांचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना राकेश टिकैत म्हणाले की, हा व्हिडिओ माझाच आहे, हे मी स्वीकारतो. मात्र, काठ्या हे काही शस्त्र नाही. काठीशिवाय झेंडा कसा लावणार. झेंडा लावण्यासाठी काठ्या आणायला सांगितल्या होत्या, असे राकेश टिकैत यानी स्पष्ट केले. 

हिंसाचारात सामील असलेल्यांवर कारवाई करणार

ज्या व्यक्तीने झेंडा फडकावला, ती कोण होती? एका समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काही लोकांना भडकवण्यात आले आहे. त्यांना आंदोलन सोडावे लागेल. ज्या व्यक्तींचा हिंसाचाराशी संबंध असल्याचे सिद्ध होईल, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे राकेत टिकैत यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नाहीतर अनेक आंदोलकांनी पोलिसांना मारण्याचाही प्रयत्न केला. रात्री उशीरा सर्व आंदोलकांना लाल किल्ल्यावरून बाहेर काढण्यात आले. 

राजधानी दिल्लीतील हिंसाचारानंतर कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांसोबत 'सीआरपीएफ'च्या काही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात सुमारे ३०० पोलीस जखमी झाले असून, या संपूर्ण प्रकरणानंतर २२ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीagitationआंदोलनdelhi violenceदिल्ली