शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:34 IST

‘हाता’ची पकड मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न : अकाली दल, आपला फुटीची डोकेदुखी

मनीषा मिठबावकर चंदीगढ : पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांपैकी गुरुदासपूर, भटिंडा या जागा महत्त्वाच्या मानल्या जातात. हेच महत्त्व लक्षात घेत भाजपने अभिनेता सनी देओलला गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली. तर भटिंडामधून भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाकडून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर उभ्या आहेत. दुसरीकडे प्रतिष्ठेच्या या दोन्ही जागांवर ‘हात’ची पकड मजबूत करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसने येथे प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

या दोन्ही तुल्यबळ पक्षांना गेल्या वेळेप्रमाणेच तगडे आव्हान देण्यासाठी आपचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, आप, अकाली दलाला लागलेल्या फुटीच्या ग्रहणामुळे विभागल्या जाणाऱ्या मतांची डोकेदुखी या दोन्ही पक्षांना आहे. शिरोमणी अकाली दल हा येथील मोठा प्रादेशिक पक्ष. गेली अनेक वर्षे येथे अकाली दल-भाजप, काँग्रेसमध्ये थेट लढत रंगत असल्याचे पाहायला मिळत होते; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने येथील राजकारणात उडी घेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. मात्र आता आप, अकाली दलातील फुटीर नेत्यांनी वेगळे पक्ष काढत तिसरी आघाडी उभी केली आहे. त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या जागाही ठरणार निर्णायकपंजाब लोकसभा मतदारसंघातील अमृतसर हादेखील प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ येथे भाजपची मजबूत पकड होती. २००४ ते २०१४पर्यंत येथे नवज्योतसिंग सिद्धू भाजपचे खासदार होते. मात्र, पक्षातील मतभेदानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यंदा या जागेवर काँग्रसकडून गुरजीत सिंह अलूजा, भाजचे हरदीप सिंह पुरी तर आपकडून कुलदीप सिंह धालीवाल रिंगणात आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथे आपचे डॉ. धर्मवारी गांधी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रणीत कौर यांना मोठ्या फरकाने हरवले होते. त्यापूर्वी या मतदारसंघात सर्वाधिक प्रभाव हा काँग्रेसचा होता. आता आपशी फारकत घेत डॉ. गांधी पीडीएत सहभागी झाल्यामुळे काँगे्रसला ही जागा परत मिळवण्याची संधी आहे.

या मतदारसंघावर अकाली दलाचे वर्चस्व पाहायला मिळते. २००९, २०१४ अशाप्रकारे सलग दोनदा येथे अकाली दलाचे शेरसिंग घुबाया निवडून आले होते. त्यानंतर पक्षातील मतभेदामुळे आता घुबाया काँग्रेसकडून या जागेवर उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल लढणार आहेत. १९८५ नंतर एकदाही या जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.

१९ मे रोजी मतदान जागा - (१३) अमृतसर, आनंदपूर साहेब, खडूर साहेब, गुरुदासपूर, जालंधर, पतियाला, फतेहगड, फरीदकोट, फिरोजपूर, भटिंडा, लुधियाना, संगरूर, होशियारपूर.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसAAPआप