शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:34 IST

‘हाता’ची पकड मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न : अकाली दल, आपला फुटीची डोकेदुखी

मनीषा मिठबावकर चंदीगढ : पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांपैकी गुरुदासपूर, भटिंडा या जागा महत्त्वाच्या मानल्या जातात. हेच महत्त्व लक्षात घेत भाजपने अभिनेता सनी देओलला गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली. तर भटिंडामधून भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाकडून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर उभ्या आहेत. दुसरीकडे प्रतिष्ठेच्या या दोन्ही जागांवर ‘हात’ची पकड मजबूत करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसने येथे प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

या दोन्ही तुल्यबळ पक्षांना गेल्या वेळेप्रमाणेच तगडे आव्हान देण्यासाठी आपचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, आप, अकाली दलाला लागलेल्या फुटीच्या ग्रहणामुळे विभागल्या जाणाऱ्या मतांची डोकेदुखी या दोन्ही पक्षांना आहे. शिरोमणी अकाली दल हा येथील मोठा प्रादेशिक पक्ष. गेली अनेक वर्षे येथे अकाली दल-भाजप, काँग्रेसमध्ये थेट लढत रंगत असल्याचे पाहायला मिळत होते; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने येथील राजकारणात उडी घेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. मात्र आता आप, अकाली दलातील फुटीर नेत्यांनी वेगळे पक्ष काढत तिसरी आघाडी उभी केली आहे. त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या जागाही ठरणार निर्णायकपंजाब लोकसभा मतदारसंघातील अमृतसर हादेखील प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ येथे भाजपची मजबूत पकड होती. २००४ ते २०१४पर्यंत येथे नवज्योतसिंग सिद्धू भाजपचे खासदार होते. मात्र, पक्षातील मतभेदानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यंदा या जागेवर काँग्रसकडून गुरजीत सिंह अलूजा, भाजचे हरदीप सिंह पुरी तर आपकडून कुलदीप सिंह धालीवाल रिंगणात आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथे आपचे डॉ. धर्मवारी गांधी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रणीत कौर यांना मोठ्या फरकाने हरवले होते. त्यापूर्वी या मतदारसंघात सर्वाधिक प्रभाव हा काँग्रेसचा होता. आता आपशी फारकत घेत डॉ. गांधी पीडीएत सहभागी झाल्यामुळे काँगे्रसला ही जागा परत मिळवण्याची संधी आहे.

या मतदारसंघावर अकाली दलाचे वर्चस्व पाहायला मिळते. २००९, २०१४ अशाप्रकारे सलग दोनदा येथे अकाली दलाचे शेरसिंग घुबाया निवडून आले होते. त्यानंतर पक्षातील मतभेदामुळे आता घुबाया काँग्रेसकडून या जागेवर उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल लढणार आहेत. १९८५ नंतर एकदाही या जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.

१९ मे रोजी मतदान जागा - (१३) अमृतसर, आनंदपूर साहेब, खडूर साहेब, गुरुदासपूर, जालंधर, पतियाला, फतेहगड, फरीदकोट, फिरोजपूर, भटिंडा, लुधियाना, संगरूर, होशियारपूर.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसAAPआप