शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

गुजरातमध्ये 52 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडला; सत्ता परिवर्तनाचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 12:41 IST

1967 मध्ये गुजरातमध्ये 63.77 टक्के मतदान झाले होते. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे हे मतदान 63.6 टक्के झाले होते. निवडणूक आयोगाने बुधवारी मतदानाची टक्केवारी जाहीर केली. 

अहमदाबाद : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच लोकसभा निवडणूक पाहणाऱ्या गुजरातमधील मतदारांनी मागील 52 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडला आहे. यावेळी लोकसभेला 64.11 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा वाढलेला टक्का विधानसभेचीच पुनरावृत्ती करणार की गुजरातच्या सुपुत्राच्या पारड्यात मत टाकली हे येत्या 23 मे रोजीच कळणार आहे. मात्र, या विक्रमामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात धडकी भरली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 23 एप्रिलला झाले. या तीन टप्प्यांमध्ये 303 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी इतर राज्यांमध्ये 2014 सारखेच मतदान झाले असले तरीही गुजरात मात्र अपवाद ठरले आहे. गुजरातने गेल्या 52 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1967 मध्ये गुजरातमध्ये 63.77 टक्के मतदान झाले होते. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे हे मतदान 63.6 टक्के झाले होते. निवडणूक आयोगाने बुधवारी मतदानाची टक्केवारी जाहीर केली. 

या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार याबाबतचे अंदाज आताच लावणे चुकीचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा कल पाहता या मतदानाचा फायदा काँग्रेसलाच अधिक होण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. गेल्या निवडणुकीला सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. हा आकडा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक 75.21 टक्के मतदान वलसाडमध्ये झाले आहे. तर सौराष्ट्र आणि अमरेलीमध्ये कमी म्हणजेच 55.75 टक्के मतदान झाले आहे. हा परिसर पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांमधील असंतोषामुळे धगधगत आहे. 

आदिवासी भागात तुफानी मतदानआदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. बारदोलीमध्ये 73.57 टक्के, यानंतर छोटा नागपूर 73.44 आणि भरुचमध्ये 73.21 टक्के मतदान झाले. वलसाडसह हा भाग आदिवासी बहुल आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना राजकीय विश्लेषक हेमंत कुमार शाह यांनी सांगितले की, मतदानाचा वाढलेला टक्का हा भाजपाच्या पारड्यात पडला असे म्हणता येणार नाही. मात्र, जर हे मतदान शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढले असेल तर त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. आदिवासी भागात झालेले मतदान हे बदलाचे संकेत देते. मात्र, आताच अंदाज लावणे कठीण जाईल. 

काँग्रेसला 8 ते 10 जागा?तर पॉलिटीकल सायन्सचे निवृत्त प्राध्यापक दिनेश शुक्ला यांनी सांगितले की, आदिवासी, दलित आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदाता आहे. यामुळे टक्केवारीवरून असे दिसतेय की भाजपाला सर्वच्या सर्व जागा मिळणार नाहीत. 2014 च्या तुलनेत मतदानाचा पॅटर्न बदलला आहे. काँग्रेसला गुजरातमध्ये 8 ते 10 जागा मिळतील. 

टॅग्स :Gujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी