शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

डॉ.आंबेडकर व मोदी ब्राह्मण, श्रीकृष्ण ओबीसी; भाजपा नेत्याची मुक्ताफळे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 3:24 PM

विद्यासंपन्न ब्राह्मणांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला.

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा इशारा देऊनही भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या वर्तणुकीत कोणताही फरक पडलेला दिसत नाही. गुजरातमधील विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून त्याचा प्रत्यय आला. गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण व्यापार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राह्मण असल्याचे म्हटले. तसेच श्रीकृष्ण ओबीसी होता, संदीपन ऋषींनी त्यांना देव केले. विद्यासंपन्न ब्राह्मणांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळेच चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या यशात ब्राह्मणांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात चाणक्यही राजा होऊ शकला असता. मात्र, चाणक्याला सत्तेची हाव नव्हती. ब्राह्मणांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला, असे त्रिवेदी यांनी म्हटले. त्रिवेदींनी हे विधान केले त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे आता त्रिवेदींची कानउघडणी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. नको त्या विषयावर पांडित्य दाखविण्याऐवजी या मंडळींनी ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ते आपले लोकसेवेचे काम करावे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, मोदींचा हा सल्ला भाजपच्या नेत्यांनी फारसा मनावर घेतलेला दिसत नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर