शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Nitish Kumar : "येथे दारूच्या बाटल्या येत असतील तर..."; नितीश कुमारांचं तेजस्वी यादव यांना जोरदार प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 18:23 IST

Nitish Kumar And Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच दरम्यान नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नवी दिल्ली - बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी दारूबंदी (Liquor Ban) केली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून नेली जाणारी दारू पकडली जाते. तसेच गावठी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू होत असतो. दारूबंदीवरून बिहारमधील वातावरण तापलेले असताना आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे. विधानसभेच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बाटल्या रिकाम्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मी त्यांना (उपमुख्यमंत्री) विचारलं, त्यांनी सांगितलं की या परिसरात कुठेतरी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. हे अत्यंत वाईट आहे. हे कसं सहन केलं जाऊ शकतं? मी सभापतींसमोर हे सांगतो, जर त्यांनी परवानगी दिली तर मी सर्वांना आजच याचा तपास करण्यास सांगेन" असं म्हटलं आहे. तसेच "मी मुख्य सचिव आणि डीजीपी यांना चौकशी करण्यासा सांगेन. येथे बाटल्या येत असतील तर ही काही सामान्य बाब नाही. हे कृत्य करणाऱ्यास सोडलं जाऊ नये. कडक कारवाई करावी" असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध"

विधानसभा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याचं वृत्त कळताच तेजस्वी यादव हे पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी हा प्रकार अद्भुत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. बिहारमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही विधानसभेत दारू आणली जाते, त्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. मग बिहारमध्ये काय सुरु असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता, असे तेजस्वी म्हणाले आहेत.

"मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा"

हा एक गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. बिहारभर उघडउघड दारू विकली जात आहे. विधानसभेत सापडत आहे, असा मुद्दा तेजस्वी यांनी विधानसभेत उपस्थित केला, यावर अध्यक्षांनी उद्यापासून सुरक्षा वाढविली जाईल असे सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. राजद आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपा आमदार संजय सरावगी यांच्यात बाचाबाची झाली. एवढी की दोघेही सभागृहात आहे हे विसरले आणि एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले.

 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारliquor banदारूबंदी