शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Nitish Kumar : "येथे दारूच्या बाटल्या येत असतील तर..."; नितीश कुमारांचं तेजस्वी यादव यांना जोरदार प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 18:23 IST

Nitish Kumar And Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच दरम्यान नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नवी दिल्ली - बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी दारूबंदी (Liquor Ban) केली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून नेली जाणारी दारू पकडली जाते. तसेच गावठी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू होत असतो. दारूबंदीवरून बिहारमधील वातावरण तापलेले असताना आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे. विधानसभेच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बाटल्या रिकाम्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मी त्यांना (उपमुख्यमंत्री) विचारलं, त्यांनी सांगितलं की या परिसरात कुठेतरी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. हे अत्यंत वाईट आहे. हे कसं सहन केलं जाऊ शकतं? मी सभापतींसमोर हे सांगतो, जर त्यांनी परवानगी दिली तर मी सर्वांना आजच याचा तपास करण्यास सांगेन" असं म्हटलं आहे. तसेच "मी मुख्य सचिव आणि डीजीपी यांना चौकशी करण्यासा सांगेन. येथे बाटल्या येत असतील तर ही काही सामान्य बाब नाही. हे कृत्य करणाऱ्यास सोडलं जाऊ नये. कडक कारवाई करावी" असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध"

विधानसभा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याचं वृत्त कळताच तेजस्वी यादव हे पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी हा प्रकार अद्भुत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. बिहारमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही विधानसभेत दारू आणली जाते, त्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. मग बिहारमध्ये काय सुरु असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता, असे तेजस्वी म्हणाले आहेत.

"मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा"

हा एक गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. बिहारभर उघडउघड दारू विकली जात आहे. विधानसभेत सापडत आहे, असा मुद्दा तेजस्वी यांनी विधानसभेत उपस्थित केला, यावर अध्यक्षांनी उद्यापासून सुरक्षा वाढविली जाईल असे सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. राजद आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपा आमदार संजय सरावगी यांच्यात बाचाबाची झाली. एवढी की दोघेही सभागृहात आहे हे विसरले आणि एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले.

 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारliquor banदारूबंदी