शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आता बॉटल नष्ट करणारे मशिन!; ४0७ स्थानकांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 1:19 AM

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वे विभागाचा निर्णय

संतोष ठाकूरनवी दिल्ली : रेल्वेने प्रवाशांना आता रिकाम्या बॉटल्स परत कराव्या लागतील. स्टेशनसह रेल्वेगाड्यांमध्ये आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) तसेच इतर करारबद्द एजन्सीच्या कर्मचाऱ्यांंवर बॉटल जमा करण्याची जबाबदारी राहील. बॉटल एकत्रित करण्यासाठी एक बॉक्सही ठेवण्यात येणार आहे. देशातील सर्व अ-१ आणि अ-२ श्रेणीतील ४०७ रेल्वे स्टेशनवर पथदर्शी प्रयोगाच्या आधारे बॉटल नष्ट करणारी मशिन लावण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इतर मोठ्या स्टेशनवर देखील ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. एकाचवेळी वापरात येणारे प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आले होते. मोदींच्या आवाहनानंतर हे काम हाती घेण्यात आले आहे. गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरपासून हे काम सुरू केले जाईल.

रेल नीर प्रकल्पाचे भविष्य धोक्यात!या निर्णयामुळे आयआरसीटीसीकडून उभारण्यात येणाºया रेल नीरच्या प्लान्टचे भविष्य धोक्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत दररोज ६ लाख लिटर पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात. हे प्रमाण १६ लाख लिटरच्या घरात नेण्याचे उद्दिष्ट आयआरसीटीसीचे आहे.

पाणी व्यवसायात १० टक्के वाढरेल्वेतील पिण्याच्या पाण्याची गरज आरआरसीटीसी भागवू शकत नाही. दुसºया ब्रॅन्डच्या पाण्याची त्यामुळे मागणी वाढली आहे. सध्या रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत पाणी विक्रीचा व्यवसाय वर्षाकाठी ६०० कोटींच्या घरात पोहचला आहे. व्यवसायात वर्षाकाठी १० टक्क्यांनी वाढ होत आहे.

एकदा वापरात येणाºया प्लॅस्टिकच्या बॉटलवर बंदी आली, तर नव्या प्लान्टचे काय होईल? यासंबंधी आयआरसीटीसी संभ्रमात आहे.आयआरसीटीसीवर वाढेल आर्थिक ओझे सर्व बॉटल गोळा करण्यासाठी रेल्वे तसेच स्टेशनवर कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागेल. आयआरसीटीसीवर त्यामुळे आर्थिक ओझे वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान करारांमधील नियमांमध्येही बदल करावा लागेल. करारबद्द एजन्सीला हे काम करण्याचे बंधन घालण्यात येईल. अगोदर करण्यात आलेल्या करारांमध्ये हा नियम कशाप्रकारे लागू करता येईल, या पर्यायांचा शोध आता आयआरसीटीसीकडून घेण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे