शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आता बॉटल नष्ट करणारे मशिन!; ४0७ स्थानकांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:19 IST

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वे विभागाचा निर्णय

संतोष ठाकूरनवी दिल्ली : रेल्वेने प्रवाशांना आता रिकाम्या बॉटल्स परत कराव्या लागतील. स्टेशनसह रेल्वेगाड्यांमध्ये आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) तसेच इतर करारबद्द एजन्सीच्या कर्मचाऱ्यांंवर बॉटल जमा करण्याची जबाबदारी राहील. बॉटल एकत्रित करण्यासाठी एक बॉक्सही ठेवण्यात येणार आहे. देशातील सर्व अ-१ आणि अ-२ श्रेणीतील ४०७ रेल्वे स्टेशनवर पथदर्शी प्रयोगाच्या आधारे बॉटल नष्ट करणारी मशिन लावण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इतर मोठ्या स्टेशनवर देखील ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. एकाचवेळी वापरात येणारे प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आले होते. मोदींच्या आवाहनानंतर हे काम हाती घेण्यात आले आहे. गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरपासून हे काम सुरू केले जाईल.

रेल नीर प्रकल्पाचे भविष्य धोक्यात!या निर्णयामुळे आयआरसीटीसीकडून उभारण्यात येणाºया रेल नीरच्या प्लान्टचे भविष्य धोक्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत दररोज ६ लाख लिटर पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात. हे प्रमाण १६ लाख लिटरच्या घरात नेण्याचे उद्दिष्ट आयआरसीटीसीचे आहे.

पाणी व्यवसायात १० टक्के वाढरेल्वेतील पिण्याच्या पाण्याची गरज आरआरसीटीसी भागवू शकत नाही. दुसºया ब्रॅन्डच्या पाण्याची त्यामुळे मागणी वाढली आहे. सध्या रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत पाणी विक्रीचा व्यवसाय वर्षाकाठी ६०० कोटींच्या घरात पोहचला आहे. व्यवसायात वर्षाकाठी १० टक्क्यांनी वाढ होत आहे.

एकदा वापरात येणाºया प्लॅस्टिकच्या बॉटलवर बंदी आली, तर नव्या प्लान्टचे काय होईल? यासंबंधी आयआरसीटीसी संभ्रमात आहे.आयआरसीटीसीवर वाढेल आर्थिक ओझे सर्व बॉटल गोळा करण्यासाठी रेल्वे तसेच स्टेशनवर कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागेल. आयआरसीटीसीवर त्यामुळे आर्थिक ओझे वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान करारांमधील नियमांमध्येही बदल करावा लागेल. करारबद्द एजन्सीला हे काम करण्याचे बंधन घालण्यात येईल. अगोदर करण्यात आलेल्या करारांमध्ये हा नियम कशाप्रकारे लागू करता येईल, या पर्यायांचा शोध आता आयआरसीटीसीकडून घेण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे