शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आता बॉटल नष्ट करणारे मशिन!; ४0७ स्थानकांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:19 IST

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वे विभागाचा निर्णय

संतोष ठाकूरनवी दिल्ली : रेल्वेने प्रवाशांना आता रिकाम्या बॉटल्स परत कराव्या लागतील. स्टेशनसह रेल्वेगाड्यांमध्ये आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) तसेच इतर करारबद्द एजन्सीच्या कर्मचाऱ्यांंवर बॉटल जमा करण्याची जबाबदारी राहील. बॉटल एकत्रित करण्यासाठी एक बॉक्सही ठेवण्यात येणार आहे. देशातील सर्व अ-१ आणि अ-२ श्रेणीतील ४०७ रेल्वे स्टेशनवर पथदर्शी प्रयोगाच्या आधारे बॉटल नष्ट करणारी मशिन लावण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इतर मोठ्या स्टेशनवर देखील ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. एकाचवेळी वापरात येणारे प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आले होते. मोदींच्या आवाहनानंतर हे काम हाती घेण्यात आले आहे. गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरपासून हे काम सुरू केले जाईल.

रेल नीर प्रकल्पाचे भविष्य धोक्यात!या निर्णयामुळे आयआरसीटीसीकडून उभारण्यात येणाºया रेल नीरच्या प्लान्टचे भविष्य धोक्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत दररोज ६ लाख लिटर पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात. हे प्रमाण १६ लाख लिटरच्या घरात नेण्याचे उद्दिष्ट आयआरसीटीसीचे आहे.

पाणी व्यवसायात १० टक्के वाढरेल्वेतील पिण्याच्या पाण्याची गरज आरआरसीटीसी भागवू शकत नाही. दुसºया ब्रॅन्डच्या पाण्याची त्यामुळे मागणी वाढली आहे. सध्या रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत पाणी विक्रीचा व्यवसाय वर्षाकाठी ६०० कोटींच्या घरात पोहचला आहे. व्यवसायात वर्षाकाठी १० टक्क्यांनी वाढ होत आहे.

एकदा वापरात येणाºया प्लॅस्टिकच्या बॉटलवर बंदी आली, तर नव्या प्लान्टचे काय होईल? यासंबंधी आयआरसीटीसी संभ्रमात आहे.आयआरसीटीसीवर वाढेल आर्थिक ओझे सर्व बॉटल गोळा करण्यासाठी रेल्वे तसेच स्टेशनवर कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागेल. आयआरसीटीसीवर त्यामुळे आर्थिक ओझे वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान करारांमधील नियमांमध्येही बदल करावा लागेल. करारबद्द एजन्सीला हे काम करण्याचे बंधन घालण्यात येईल. अगोदर करण्यात आलेल्या करारांमध्ये हा नियम कशाप्रकारे लागू करता येईल, या पर्यायांचा शोध आता आयआरसीटीसीकडून घेण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे