शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बॉलिवूडच्या कलाकारांनीही लावली आहे लोकसभेमध्ये हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 01:01 IST

दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणावर तेथील चित्रपटसृष्टीचा प्रचंड प्रभाव आहे, अनेक कलाकार तेथील राजकारणात सक्रिय आहेत, असे सततत सांगण्यात येत असते.

नवी दिल्ली : दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणावर तेथील चित्रपटसृष्टीचा प्रचंड प्रभाव आहे, अनेक कलाकार तेथील राजकारणात सक्रिय आहेत, असे सततत सांगण्यात येत असते. पण हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारही राजकारणात आले आणि ते लोकसभेवर निवडूनही आले, असे दिसून येते. मात्र पहिला अभिनेता लोकसभेवर गेला, तो मात्र होता दक्षिणेकडील राज्यातलाच.आंध्र प्रदेशातील ओंगोल मतदारसंघातून १९६७ साली काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले ते तेलगू अभिनेते होते कोंगरा जग्गय्या. त्यानंतरच्या अनेक निवडणुकांद्वारे चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार लोकसभेवर निवडून गेले.अभिनेते सुनील दत्त वायव्य मुंबईतून १९८४ साली लोकसभेवर निवडून गेले. त्या मतदारसंघाचे त्यांनी पाच वेळा प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या पत्नी नर्गिस दत्त याही खासदार होत्या. पण त्या राज्यसभा सदस्य होत्या. वैजयंती माला याही १९८४ साली मद्रास (आता चेन्नई) दक्षिण मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्याचवर्षी अमिताभ बच्चन हेही अलाहाबादमधून काँग्रेसतर्फे विजयी झाले. त्यांनी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता. त्यांच्या पत्नीही खासदार आहेत. पण राज्यसभा सदस्य असलेल्या जया बच्चन या समाजवादी पक्षात आहेत.दूरदर्शनवरील रामायण मालिकेतील सीता म्हणजे दीपिका चिखलिया व रावण म्हणजे अरविंद त्रिवेदी १९९१ साली अनुक्रमे बडोदा व साबरकांठामधून भाजपातर्फे निवडून आले होते. तेव्हा राम मंदिर हा मुद्दा भाजपाने जोरात लावून धरला होता. महाभारत या मालिकेतील कृष्ण म्हणजे नितीश भारद्वाज हेही १९९६ साली जमशेदपूरमधून निवडून आले होते.राजेश खन्ना यांनी १९९२ ते १९९६ या काळात नवी दिल्ली मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी तेव्हा भाजपाच्या शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला होता. मात्र १९९१ साली राजेश खन्ना यांचा भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १५८९ मतांनी पराभव केला होता. विनोद खन्ना भाजपातर्फे पंजाबच्या गुरूदासपूरमधून तीनदा निवडून आले होते आणि ते केंद्रात मंत्रीही होते. शत्रुघ्न सिन्हा भाजपातर्फे बिहारच्या पाटणासाहिबमधून १९९९ व२0१४ साली निवडून आले. तेही केंद्रातमंत्री होते. पण बंडखोरी करणाऱ्या सिन्हायांना यंदा भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षातर्फे उभे राहणार, हे स्पष्ट नाही.राज बब्बर हे दोनदा समाजवादी पार्टीतर्फे तर एकदा काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशातून निवडून आले. ते यंदाही काँग्रेसचे उमेदवार आहेत. अभिनेत्री जया प्रदा दोनदा समाजवादी पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेल्या. पण २0१४ साली त्या पराभूत झाल्या. यंदा त्या रिंगणात नाहीत. गोविंदा २00४ साली काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून निवडून आले होते. धर्मेंद्र हे २00४ साली राजस्थानमधून भाजपातर्फे लोकसभेत गेले होते. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी याही भाजपातर्फे २0१४ साली मथुरातून निवडून आल्या. त्या यंदाही निवडणूक लढवत आहेत.याखेरीज परेश रावल (गुजरात), किरण खेर (चंदीगड), मनोज तिवारी (दिल्ली) व गायक बाबुल सुप्रियो हेही २0१४ साली भाजपातर्फे लोकसभेवर निवडून गेले. अभिनेत्री मूनमून सेन या बंगालमधून तृणमूल काँग्रेसतर्फे निवडून गेल्या. यंदाही त्या रिंगणात आहे. याखेरीज अन्य पक्षांतर्फे यंदाही काही कलाकार निवडणूक लढवत आहेत.पराभूत सेलिब्रिटीलोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, दिग्दर्शक मुझफ्फर अली, नफिसा अली, शेखर सुमन, गुल पनाग, जॉय बॅनर्जी, जावेद जाफ्री, महेश मांजरेकर, राखी सावंत यांचा समावेश आहे. पराभूत होऊ नही भाजपाने स्मृती इराणी यांना मंत्री केले. त्या यंदाही अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक