शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधींच्या यात्रेत 'बॉडी डबल', तोच खिडकीतून हात करतो?", चक्क मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 17:37 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा असाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली.

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून सुरु झाली आहे. राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. ही यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर अधिक चर्चेत आली. कारण, २२ जानेवारी रोजी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता. मात्र, दुसरीकडे राहुल गांधींना आसाममधील मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आले होते. त्यानंतर, राहुल गांधींवर एफआयआरही दाखल झाला आहे. त्यामुळे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधींमध्ये शाब्दीत वाद रंगला आहे. त्यातच, आता हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा असाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. त्यानंतर, असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी(25 जानेवारी) या यात्रेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी यात्रेच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर जातीय संघर्ष भडकवण्याचा आरोप केला. तसेच, राहुल गांधींकडून यात्रेत बॉडी डबल घेऊन फिरत असल्याचा आरोपही बिस्वा यांनी एका वृत्ताच्या आधारे केला आहे. 

राहुल गांधींचा डुप्लीकेट?

यावेळी सरमा यांनी एक मोठा दावा केला. राहुल गांधी त्यांच्या यात्रेत “बॉडी डबल” (डुप्लीकेट) वापरतात. याचाच अर्थ बसमध्ये बसून खिडकीतून लोकांकडे पाहणारी व्यक्ती बहुधा राहुल गांधी नसावी, असा दावा हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तसेच, आई कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाची तयारी पूर्ण केल्यानंतरही त्यांनी देवीचे दर्शन घेतले नाही. बाटद्रवा पोलीस स्टेशनला जाण्यासाठी २ तास थांबू शकले नाहीत. लचित बारफुकन आणि भूपेन हजारिका यांच्या समाधीजवळून गेले, पण अभिवादन केले नाही. बारपेटा येथील प्रसिद्ध सत्रा आणि धुब्रीच्या ऐतिहासिक गुरुद्वाराला भेट दिली नाही. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवानंतर आसाममधील पवित्र स्थळांना भेटी न देऊन दंगली घडवण्याचा त्यांचा कट होता का? असा सवालही त्यांनी केला.

मतदार उत्तर देणार

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, काँग्रेसचा आत्मा मारला गेला आहे. सर्वात जुना पक्ष गांधीवादी तत्त्वज्ञानापासून दूर गेला असून आता सॉफ्ट नक्षलवादी बनला आहे. गुवाहाटीमध्ये आम्हाला याची झलक पाहायला मिळाली. राम मंदिराच्या अभिषेकावेळी राज्यात संघर्ष झाला, पण आमच्या पक्षाच्या लोकांनी आणि रामभक्तांनी स्वतःला ताब्यात ठेवले आणि राज्यात अनुचित प्रकार घडू दिला नाही. आसामची जनता लोकसभा निवडणुकीत तुमच्या अहंकाराला नक्की उत्तर देईल, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

राहुल गांधींना अटक होणार

दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी (24 जानेवारी) राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल, अशी माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही राहुल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. विशेष तपास पथक तपास करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना अटक केली जाईल. भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसाचार भडकवल्याबद्दल राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssamआसामcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा