शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

विमानातील एक मृतदेह लाईफ जॅकेट घातलेला

By admin | Updated: January 1, 2015 03:20 IST

खराब हवामानामुळे एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष शोधण्याच्या कामात अडथळे येत असून, शोधकाम थांबविण्यात आले आहे.

खराब हवामानामुळे शोधमोहीम थांबविली : सात मृतदेह सापडले, ओळख पटविण्यासाठी पीडित कुटुंबियांचे डीएनए नमुने घेणारजकार्ता/सिंगापूर : खराब हवामानामुळे एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष शोधण्याच्या कामात अडथळे येत असून, शोधकाम थांबविण्यात आले आहे. जावा समुद्रातील भरतीच्या लाटांमुळे अपघातग्रस्त विमान अपघात झालेल्या ठिकाणापासून बरेच दूरपर्यंत लोटले गेले आहे. अपघातग्रस्त विमान समुद्रात कोसळताना एकसंध असावे, असे मानले जात आहे. विमानातून आतापर्यंत सात मृतदेह वर काढण्यात आले असून, त्यातील एका मृतदेहाच्या अंगावर लाईफ जॅकीट आहे. त्यामुळे अपघात कसा झाला असावा याबद्दल पुन्हा विचार केला जात आहे. १६२ लोकांसह इंडोनेशियातील सुराबाया ते सिंगापूरला जाणाऱ्या क्यूझेड ८५०१ या विमानाला रविवारी अपघात झाला असून, मुसळधार पाऊस, वारे व दाट ढग यामुळे बुधवारीही अपघातग्रस्त विमानाचा शोध घेणे थांबविण्यात आले आहे. वर काढलेल्या सात मृतदेहांपैकी एक महिला फ्लाईट अटेंडंटचा असून तिच्या अंगावर एअर एशियाचा गणवेश आहे, असे इंडोनेशियाच्या शोध संस्थेचे प्रमुख बाम्बांग सोएलिस्तो यांनी सांगितले. विमानातील अवशेषातून वर काढलेले पहिले दोन मृतदेह सुराबाया येथे आणण्यात आले. तिथे नातेवाईक मृतदेहांची वाट पाहत आहेत. सुराबाया येथे सैनिकांनी दोन मृतदेह आणले असून, नातेवाईकांना डीएनएचे नमुने देण्यास सांगण्यात आले आहे. सिंगापूरला जाणाऱ्या या विमानाला अपघात होऊन तीन दिवस उलटल्यानंतर मंगळवारी विमानाचे अवशेष पांगाकलान्बूनजवळ कारीमाता खाडीत सापडले. समुद्रात अनेक मृतदेह तरंगत असल्याचे शोधमोहीमेतील सदस्यांना दिसले असून, ते बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. भरती व मुसळधार पाऊस यामुळे मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले आहे. हवामान सुधारले की मदतकार्य पुन्हा चालू केले जाईल. मृतदेह पांगकलान बन येथे आणले जातील. या दुर्दैवी विमानातील १६२ प्रवाशांचे नातेवाईक परस्परांना मिठी मारून अश्रुपात करीत आहेत. समुद्रावर तरंगणाऱ्या मृतदेहांची छायाचित्रे टीव्हीवर पाहिल्यानंतर काल अनेकांना भावना अनावर झाल्या. अपघातग्रस्त विमानात १५५ प्रवासी होते. त्यात १ ब्रिटिश, १ मलेशियन, १ सिंगापुरी व ३ दक्षिण कोरियाचे होते, १४९ प्रवासी इंडोनेशियाचे होते. सात कर्मचारी, त्यातील सहा इंडोनशियाचे व एक सहवैमानिक फ्रेंच होता. प्रवाशांमध्ये १७ लहान मुले होती. प्रवाशांमध्ये भारतीय नागरिक नव्हते. या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानंतर नक्की काय झाले हे गूढ अद्याप उलगडलेले नाही. (वृत्तसंस्था)च्सोनार प्रतिमानी समुद्राच्या तळाशी असणारे अवशेष एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचेच असल्याचे शोधल्यानंतर मृतदेह व ब्लॅकबॉक्स शोधण्यासाठी पाणबुडे तैनात करण्यात आले; पण खराब हवामानामुळे शोध थांबवावा लागला.च्जोरदार लाटांमुळे अवशेष पुढे लोटले जात असून, मंगळवारी आढळलेल्या ठिकाणापासून बुधवारी ते ५० कि.मी. पुढे गेले आहेत. मृतदेह आता किनाऱ्याला लागतील, असे व्हाईस एअर मार्शल सुनारबोवो सांदी यांनी सांगितले.