शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
4
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
5
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
6
सात युद्धे थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच; कुणाला मिळाला 'शांतता पुरस्कार'
7
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
8
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
9
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
10
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
11
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
12
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
13
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
14
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
15
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
16
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
17
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
18
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
19
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
20
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:27 IST

जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.

नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा भाजपाला उचलायचा आहे. बिहार निवडणुका येत आहेत. पुलवामा झाले तेव्हाही निवडणूक होती. पुरीमध्ये हल्ला झाला त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा भाजपाने घेतला. पुलवामा हल्ल्यात शहीदांच्या नावे मोदींनी मते मागितली. त्यामुळे जे काही झाले ते बिहार निवडणुकीसाठी झाल्याचे मला वाटते. भाजपाची तिरंगा यात्राही क्रेडिट घेण्यासाठीच सुरू असल्याचं सांगत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपावर घणाघात केला.

राष्ट्रपती निवडणूक लढलेले यशवंत सिन्हा यांनी कपिल सिब्बल यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं की, भाजपाचे लोक आता हे सांगत आहेत, नरेंद्र मोदींनी कमाल केली तर पहलगाममध्ये झालेल्या २६ नागरिकांच्या हत्येला जबाबदार कोण हे का विचारले जात नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटले. त्यावर आतापर्यंत पुलवामाचा खुलासा झाला नाही. त्याप्रकारे पहलगामवरही खुलासा होणार नाही. अखेर पहलगाममध्ये एकही जवान किंवा पोलीस का नव्हता. जे लोक हत्या करून पळाले त्यांच्याबाबत काहीच माहिती का मिळू शकत नाही. ते कुठे गेलेत असा सवाल यशवंत सिन्हा यांनी विचारला. 

तसेच पाकिस्तानसोबत केवळ पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल असं भारत सरकार म्हणते, असे असेल तर पाकिस्तानसोबत चर्चाच होऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी सांगितले. सीजफायरच्या निर्णयावरही यशवंत सिन्हा यांनी प्रश्न उपस्थित केला. डिजीएमओमध्ये संवाद झाला. पाकिस्तानकडून सीजफायरची विनंती करण्यात आली मग घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून का झाली? ट्रम्प यांच्या घोषणेपूर्वी भारताने काहीच का सांगितले नाही. अद्यापही नरेंद्र मोदी यावर गप्प आहेत असं सिन्हा म्हणाले. 

दरम्यान, आम्ही बऱ्याचदा काश्मीरात गेलो, तिथे देवेंद्र सिंह नावाचा एक डिएसपी होता, एअरपोर्ट सिक्युरिटी आणि अॅन्टी टेरिजन्म स्क्वॉडचा डिएसपी होता. तो एकेदिवशी दहशतवाद्यांसोबत पकडला गेला. ज्यांनी त्याला पकडले ते सीआरपीएफचे पोलीस होते. हा सरकारचा खास माणूस आहे हे त्यांना माहिती नव्हते. दहशतवाद्यांसोबत तो चालला होता त्याला पकडले गेले. परंतु तो कुठे गायब झाला हे आजतागायत कुणाला माहिती नाही. त्याच्यावर खटला चालला, निलंबित केले, पुढे काय झाले त्याचे उत्तर नाही. पहलगाम हल्ल्यावेळी २ हजार पर्यटक तिथे असताना एकही जवान नाही. जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.  

टॅग्स :IndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपाPakistanपाकिस्तान