शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:27 IST

जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.

नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा भाजपाला उचलायचा आहे. बिहार निवडणुका येत आहेत. पुलवामा झाले तेव्हाही निवडणूक होती. पुरीमध्ये हल्ला झाला त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा भाजपाने घेतला. पुलवामा हल्ल्यात शहीदांच्या नावे मोदींनी मते मागितली. त्यामुळे जे काही झाले ते बिहार निवडणुकीसाठी झाल्याचे मला वाटते. भाजपाची तिरंगा यात्राही क्रेडिट घेण्यासाठीच सुरू असल्याचं सांगत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपावर घणाघात केला.

राष्ट्रपती निवडणूक लढलेले यशवंत सिन्हा यांनी कपिल सिब्बल यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं की, भाजपाचे लोक आता हे सांगत आहेत, नरेंद्र मोदींनी कमाल केली तर पहलगाममध्ये झालेल्या २६ नागरिकांच्या हत्येला जबाबदार कोण हे का विचारले जात नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटले. त्यावर आतापर्यंत पुलवामाचा खुलासा झाला नाही. त्याप्रकारे पहलगामवरही खुलासा होणार नाही. अखेर पहलगाममध्ये एकही जवान किंवा पोलीस का नव्हता. जे लोक हत्या करून पळाले त्यांच्याबाबत काहीच माहिती का मिळू शकत नाही. ते कुठे गेलेत असा सवाल यशवंत सिन्हा यांनी विचारला. 

तसेच पाकिस्तानसोबत केवळ पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल असं भारत सरकार म्हणते, असे असेल तर पाकिस्तानसोबत चर्चाच होऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी सांगितले. सीजफायरच्या निर्णयावरही यशवंत सिन्हा यांनी प्रश्न उपस्थित केला. डिजीएमओमध्ये संवाद झाला. पाकिस्तानकडून सीजफायरची विनंती करण्यात आली मग घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून का झाली? ट्रम्प यांच्या घोषणेपूर्वी भारताने काहीच का सांगितले नाही. अद्यापही नरेंद्र मोदी यावर गप्प आहेत असं सिन्हा म्हणाले. 

दरम्यान, आम्ही बऱ्याचदा काश्मीरात गेलो, तिथे देवेंद्र सिंह नावाचा एक डिएसपी होता, एअरपोर्ट सिक्युरिटी आणि अॅन्टी टेरिजन्म स्क्वॉडचा डिएसपी होता. तो एकेदिवशी दहशतवाद्यांसोबत पकडला गेला. ज्यांनी त्याला पकडले ते सीआरपीएफचे पोलीस होते. हा सरकारचा खास माणूस आहे हे त्यांना माहिती नव्हते. दहशतवाद्यांसोबत तो चालला होता त्याला पकडले गेले. परंतु तो कुठे गायब झाला हे आजतागायत कुणाला माहिती नाही. त्याच्यावर खटला चालला, निलंबित केले, पुढे काय झाले त्याचे उत्तर नाही. पहलगाम हल्ल्यावेळी २ हजार पर्यटक तिथे असताना एकही जवान नाही. जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.  

टॅग्स :IndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपाPakistanपाकिस्तान