शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:27 IST

जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.

नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा भाजपाला उचलायचा आहे. बिहार निवडणुका येत आहेत. पुलवामा झाले तेव्हाही निवडणूक होती. पुरीमध्ये हल्ला झाला त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा भाजपाने घेतला. पुलवामा हल्ल्यात शहीदांच्या नावे मोदींनी मते मागितली. त्यामुळे जे काही झाले ते बिहार निवडणुकीसाठी झाल्याचे मला वाटते. भाजपाची तिरंगा यात्राही क्रेडिट घेण्यासाठीच सुरू असल्याचं सांगत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपावर घणाघात केला.

राष्ट्रपती निवडणूक लढलेले यशवंत सिन्हा यांनी कपिल सिब्बल यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं की, भाजपाचे लोक आता हे सांगत आहेत, नरेंद्र मोदींनी कमाल केली तर पहलगाममध्ये झालेल्या २६ नागरिकांच्या हत्येला जबाबदार कोण हे का विचारले जात नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटले. त्यावर आतापर्यंत पुलवामाचा खुलासा झाला नाही. त्याप्रकारे पहलगामवरही खुलासा होणार नाही. अखेर पहलगाममध्ये एकही जवान किंवा पोलीस का नव्हता. जे लोक हत्या करून पळाले त्यांच्याबाबत काहीच माहिती का मिळू शकत नाही. ते कुठे गेलेत असा सवाल यशवंत सिन्हा यांनी विचारला. 

तसेच पाकिस्तानसोबत केवळ पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल असं भारत सरकार म्हणते, असे असेल तर पाकिस्तानसोबत चर्चाच होऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी सांगितले. सीजफायरच्या निर्णयावरही यशवंत सिन्हा यांनी प्रश्न उपस्थित केला. डिजीएमओमध्ये संवाद झाला. पाकिस्तानकडून सीजफायरची विनंती करण्यात आली मग घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून का झाली? ट्रम्प यांच्या घोषणेपूर्वी भारताने काहीच का सांगितले नाही. अद्यापही नरेंद्र मोदी यावर गप्प आहेत असं सिन्हा म्हणाले. 

दरम्यान, आम्ही बऱ्याचदा काश्मीरात गेलो, तिथे देवेंद्र सिंह नावाचा एक डिएसपी होता, एअरपोर्ट सिक्युरिटी आणि अॅन्टी टेरिजन्म स्क्वॉडचा डिएसपी होता. तो एकेदिवशी दहशतवाद्यांसोबत पकडला गेला. ज्यांनी त्याला पकडले ते सीआरपीएफचे पोलीस होते. हा सरकारचा खास माणूस आहे हे त्यांना माहिती नव्हते. दहशतवाद्यांसोबत तो चालला होता त्याला पकडले गेले. परंतु तो कुठे गायब झाला हे आजतागायत कुणाला माहिती नाही. त्याच्यावर खटला चालला, निलंबित केले, पुढे काय झाले त्याचे उत्तर नाही. पहलगाम हल्ल्यावेळी २ हजार पर्यटक तिथे असताना एकही जवान नाही. जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.  

टॅग्स :IndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपाPakistanपाकिस्तान