शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

चकित करणारी बातमी; आजही झोपडीत राहतो भाजपाचा 'हा' आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 14:09 IST

एखादा आमदार म्हटला की त्याचा आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा ताफा आदी आपल्या नजरेसमोर येते. मात्र मध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतो.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतोसीताराम आदिवासी असे या आमदाराचे नाव आहे डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयपूर मतदारसंघातून सीताराम काँग्रेसचे बलाढ्य नेते रामनिवास रावत यांना पराभूत करून निवडून आले आहेत

भोपाळ - राजकारण्यांकडे असलेली अमाप संपत्ती हा आपल्या देशातील चर्चेचा आणि ईर्षेचा विषय. साध्या सरपंचापासून आमदार, खासदारांपर्यंत बहुतांश राजकारण्यांकडे गडगंज संपत्तीचा संचय झालेला असतो. एखादा आमदार म्हटला की त्याचा आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा ताफा आदी आपल्या नजरेसमोर येते. मात्र मध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतो. सीताराम आदिवासी असे या आमदाराचे नाव असून, डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयपूर मतदारसंघातून ते काँग्रेसचे बलाढ्य नेते रामनिवास रावत यांना पराभूत करून निवडून आले आहेत. सीताराम यांनी तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. याआधी दोनवेळा त्यांना अपयश आले होते. मात्र यावेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली. मात्र राजकारणात एकढी वर्षे सक्रिय राहिल्यानंतरही सीताराम यांच्याकडे राहण्यासाठी अद्याप पक्के घर नाही. ते एका झोपडीसदृश घरात अजूनही राहतात. दरम्यान, सीताराम यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने परिसरातील नागरिकांनी निधी उभारून त्यांना घर बांधून देण्याची तयारी केली आहे. आपला आमदार झोपडीत राहतो, ही बाब योग्य न वाटल्याने आम्ही त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिक सांगतात. आमदार झाले असले तरी सीताराम यांचे राहणीमान अद्यापही ग्रामीण व्यक्तीला साजेसे आहे. ''माझ्याकडे पैसे नसल्याने मी पक्के घर बांधू शकत नाही. एकेकाळी मी काँग्रेसचा सदस्य होतो. मात्र तिथे मला पुरेसे महत्त्व मिळाले नाही. त्यामुळे मी भाजपामध्ये आलो. दोन निवडणुकीत पराभव झाला. मात्र तिसऱ्या वेळी मला विजय मिळाला.'' असे सीताराम सांगतात. सीताराम हे आमच्यासाठी नेहमीच संघर्ष करतात. जिथे गरज असेल तिथे न डगमगता सोबत येतात. त्यामुळेच आमदार आमच्यामध्येच राहावेत, असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला, असे एका स्थानिकाने सांगितले. तर सीताराम यांची पत्नी इमरती बाई सांगते की, आम्ही अनेक वर्षे संघर्ष केला. आता दिवस बदलले आहेत. आतातरी आमची आर्थिक परिस्थिती सुधारून जीवन सुखी होईल, असे वाटते.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेश