शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:18 IST

व्हिडीओ रिट्विट करत दिग्विजय सिंह यांचा पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणून त्याबद्दल संशय व्यक्त करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपानं सडकून टीका केली. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिग्विजय यांच्यावर तोफ डागली. या टीकेला आता दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तुमच्याच एका वरिष्ठ नेत्यानं पुलवामातील हल्ल्याला अपघात म्हटलं होतं. याबद्दल मोदीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचं काय म्हणणं आहे, असा सवाल दिग्विजय यांनी ट्विटमधून उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. यामध्ये मौर्य यांनी पुलवामातील हल्ल्याचा उल्लेख 'मोठी दुर्घटना' असा केला आहे. या व्हिडीओवरुन दिग्विजय यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांना लक्ष्य केलं. 'मी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हटल्यावर मोदीजींपासून त्यांच्या तीन मंत्र्यांपर्यंत सगळेजण मला पाकिस्तानचा समर्थक म्हणू लागले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचं विधान ऐका. मोदीजी आणि त्यांच्या मंत्र्यांना याबद्दल काही म्हणायचं आहे का?' असा सवाल त्यांनी ट्विटमधून विचारला आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. सीआरपीएफचे अडीच हजार जवान बसेसमधून श्रीनगर जात असताना दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला. ताफ्यातील एका बसला स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं धडक दिली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर देशभरात संतापाची लाट होती. या हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला हवाई दलानं मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याचे पुरावे मागितल्यानं सध्या दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपानं टीकेची झोड उठवली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपा