शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

हाच भाजपाचा न्याय आहे का?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 09:06 IST

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. हाच भाजपाचा न्याय आहे का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. शाहजहानपूर प्रकरणात पीडितेला अटक करण्यात आली आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप या तरुणीवर ठेवण्यात आला आहे. तरुणीला अटक करण्यात आल्यानंतर हाच भाजपाचा न्याय आहे का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. प्रियंका यांनी याबाबत ट्विट केले आहे. 

विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजपा नेते चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक  छळाचा आरोप केल्याने खळबळ उडाली. तसेच बलात्काराचा आरोप झालेले भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या विधी महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थिनीला एसआयटीने अटक केली. तिच्यावर चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरून प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडित तरुणाच्या वडिलांची हत्या करण्यात आली. काकांना अटक करण्यात आली. त्यानंतर जनक्षोभाचा उद्रेक झाला आणि 13 महिन्यांनंतर आरोपी आमदाराला अटक करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच शाहजहानपूर प्रकरणात पीडितेला अटक करण्यात आली आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी ट्वीटमध्ये केला आहे.

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर अक्षरश: रडण्याची वेळ आली. खातेदारांना या बँकेतून पुढील किमान सहा महिने एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता येणार नाहीत. थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. यावरूनच प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांनी बुधवारी (25 सप्टेंबर ) पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत अकाऊंट असणाऱ्या एका महिलेचा रडतानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे. तसेच सरकारची चूक आहे मात्र त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे असं म्हणत याआधीही प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला होता.  

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण