शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मोदींची जादू ओसरल्याने भाजपा चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:40 IST

४ वर्षात २४ पैकी भाजपाने गमावली १२ राज्ये

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादूच्या बळावर विधानसभा निवडणुकीत भाजपा एकापाठोपाठ राज्ये काबीज करण्यात यशस्वी ठरली असली तरी नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादुई प्रभावाला ओहोटी लागल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे भाजपा चिंतित आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपाचे रणनीतीकार मात्र मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांच्या अपराजितपणाचा प्रचार करीत असावेत.

२०१८ मध्ये मात्र मोदींच्या जादूला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. गेल्या चार वर्षांत २४ राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला काँग्रेस-मित्र पक्षांच्या ताब्यातील १२ राज्ये कब्जात घेता आली. विशेष म्हणजे त्रिपुरातील माणिक सरकार यांच्या माकपा सरकारचा पराभव करण्यात भाजप यशस्वी ठरली. २०१७ मध्ये मात्र भाजपाला गोवा जिंकता आले नाही. गोव्यात भाजपविरोधी जनमत असल्याने भाजपला गोव्यात ४० पैकी फक्त १३ जागां जिंकता आल्या. स्पष्ट बहुमत नसताना भाजपाने गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले. दिल्ली आणि बिहारमधील पराभव चुकांची परिणिती असल्याचे भाजपने म्हटले होते; परंतु २०१८ मध्ये भाजपाला जबर हादरा बसला. कर्नाटकात सरकारविरोधी जनमत असतानाही भाजपाला या राज्यात सत्ता मिळविता आली नाही.भाजपाला २०१४ ते २०१७ या चार वर्षांत १२ राज्ये जिंकता आली असली, तरी तेवढीच बारा राज्ये काबीज करता आली नाहीत. उत्तर प्रदेशात ३२५ जागा मिळालेल्या मोठ्या प्रमाणावरील जनादेशाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, राजस्थान, छत्तीसगढ व मध्यप्रदेशात नेतृत्वबदलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जे घडले ते समोर आहे.२०१७ मध्ये भाजपाने काँग्रेसकडून हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ही राज्ये घेतली, तसेच सपा-बसपाकडून उत्तर प्रदेश घेतले व गुजरात कायम ठेवले; परंतु २०१८ मध्ये भाजपला सूर सापडला नाही व त्रिपुराशिवाय इतर राज्य जिंकता आले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहElectionनिवडणूक