शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 10:34 IST

एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे.

भुवनेश्वर - लोकसभा निवडणुकीबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनंतर भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालीली एनडीएच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधी पक्ष संभाव्य जागांच्या आकडेमोडीत गुंतले आहेत. दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या बिजू जनता दलाने निकालांनंतर एनडीएसोबत येण्याचे संकेत दिले आहे. जो पक्ष ओदिशाला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्यापक्षासोबत आम्ही जाऊ, असे बीजू जनता दलाकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ओदिशामध्ये आलेल्या फोनी चक्रीवादळावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहणी दौरा केला होता. त्यावेळी नवीन पटनाईक यांच्यासोबत मोदींनी वादळाने प्रभावीत झालेल्या भागाची पाहणी केली होती. तसेच नवीन पटनाईक यांच्याविरोधातील टीकाही कमी केली होती. त्याबरोबरच मोदींनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना वादळामुळे प्रभावित झालेल्यांसाठी नवीन पटनाईक यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच एनडीएचे बहुमत हुकल्यास बिजू जनता दल भाजपाला पाठिंबा देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती.  दरम्यान, जी आघाडी आमच्या समस्या समजून घेईल, योग्य मागण्या पूर्ण करेल त्या आघाडीला आम्ही पाठिंबा देऊ. जर एनडीए सरकार स्थापन झाले तर त्यांनाही आम्ही पाठिंबा देऊ, असे बिजू जनता दलाचे वरिष्ठ प्रवक्ते अमर पटनाईक यांनी म्हटले आहे. तसेच जी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल, त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ, असेही अमर पटनाईक यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल प्रसिद्ध केले होते. वाजता संपल्यानंतर, देशभरातील राजकीय वर्तुळात ज्याची प्रचंड उत्सुकता होती, ते एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि एजन्सींनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून आणि तज्ज्ञांची मतं घेऊन जनतेचा कौल कुणाला, याचा अंदाज बांधला आहे. स्वाभाविकच, प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे आहेत. परंतु, देशात 'फिर एक बार, मोदी सरकार' येईल, असंच बहुतांश एक्झिट पोलचे आकडे सांगताहेत. एनडीए 300 जागांपर्यंत मजल मारू शकेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोलनी भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल असे म्हटले आहे. दरम्यान,  एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज फेटाळून लावले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलBJPभाजपाBiju Janata Dalबिजू जनता दलOdisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019