शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 10:34 IST

एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे.

भुवनेश्वर - लोकसभा निवडणुकीबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनंतर भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालीली एनडीएच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधी पक्ष संभाव्य जागांच्या आकडेमोडीत गुंतले आहेत. दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या बिजू जनता दलाने निकालांनंतर एनडीएसोबत येण्याचे संकेत दिले आहे. जो पक्ष ओदिशाला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्यापक्षासोबत आम्ही जाऊ, असे बीजू जनता दलाकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ओदिशामध्ये आलेल्या फोनी चक्रीवादळावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहणी दौरा केला होता. त्यावेळी नवीन पटनाईक यांच्यासोबत मोदींनी वादळाने प्रभावीत झालेल्या भागाची पाहणी केली होती. तसेच नवीन पटनाईक यांच्याविरोधातील टीकाही कमी केली होती. त्याबरोबरच मोदींनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना वादळामुळे प्रभावित झालेल्यांसाठी नवीन पटनाईक यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच एनडीएचे बहुमत हुकल्यास बिजू जनता दल भाजपाला पाठिंबा देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती.  दरम्यान, जी आघाडी आमच्या समस्या समजून घेईल, योग्य मागण्या पूर्ण करेल त्या आघाडीला आम्ही पाठिंबा देऊ. जर एनडीए सरकार स्थापन झाले तर त्यांनाही आम्ही पाठिंबा देऊ, असे बिजू जनता दलाचे वरिष्ठ प्रवक्ते अमर पटनाईक यांनी म्हटले आहे. तसेच जी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल, त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ, असेही अमर पटनाईक यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल प्रसिद्ध केले होते. वाजता संपल्यानंतर, देशभरातील राजकीय वर्तुळात ज्याची प्रचंड उत्सुकता होती, ते एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि एजन्सींनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून आणि तज्ज्ञांची मतं घेऊन जनतेचा कौल कुणाला, याचा अंदाज बांधला आहे. स्वाभाविकच, प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे आहेत. परंतु, देशात 'फिर एक बार, मोदी सरकार' येईल, असंच बहुतांश एक्झिट पोलचे आकडे सांगताहेत. एनडीए 300 जागांपर्यंत मजल मारू शकेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोलनी भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल असे म्हटले आहे. दरम्यान,  एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज फेटाळून लावले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलBJPभाजपाBiju Janata Dalबिजू जनता दलOdisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019