शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

West Bengal: भाजपमधील कलह वाढला! दिलीप घोष यांना कार्यकर्त्यांनी घेरले; बैठकीत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 11:45 AM

West Bengal: भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.

हुगली:पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर आता भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात निदर्शने केली. (bjp west bengal chief dilip ghosh faced protest of party workers)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हुगली येथील चुचुरा भागात बुथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालत निदर्शने केली. हुगली जिल्हा समिती बरखास्त करावी आणि जिल्हाध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. 

गुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा

पक्षाच्या शिस्तीबाबत तडजोड नाही

या विरोध प्रदर्शनाबाबत बोलताना हुगली येथून खासदार असलेले लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नेते तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोध तक्रारही करण्याला विरोध नाही. त्यासाठी कार्यकर्ते स्वतंत्र आहेत. मात्र, पक्षाचे काही नियम आहेत. पक्षाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे चॅटर्जी यांनी स्पष्ट केले. तसेच यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा दावा केला. 

तृणमूल काँग्रेसवर केले आरोप

तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सामीन होऊन गोंधळ घालायला सुरुवात केली, असा दावा लॉकेट चॅटर्जी यांनी केला आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात आला असून, दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. लॉकेट चॅटर्जी आणि दिलीप घोष यांनी आधी पक्ष सांभाळावा आणि मगच इतरांना सल्ले द्यावेत, असा पलटवार तृणमूल काँग्रेस  हुगलीच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होते. मात्र तृणमूलने तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी लागण्याची चिन्हे आहेत. भाजपचे ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपला मोठे भगदाड पडू शकते, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाPoliticsराजकारण