शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती"; अशोक गेहलोतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 15:38 IST

अशोक गेहलोत यांनीही राजस्थानमधील छाप्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जयपूरमध्ये पत्रकार परिषदेत भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, "भाजपाला छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करायची होती. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेसाठी पूर्ण नियोजन करण्यात आले होते, पण त्यापूर्वीच त्याचा पर्दाफाश झाला. भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती."

अशोक गेहलोत यांनीही राजस्थानमधील छाप्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राजस्थानमध्ये इतके छापे टाकण्यात आले पण कोणत्या राजकीय नेत्याला अटक झाली का? असा सवाल त्यांनी केला. "आमच्या सरकारने खूप काम केलं आहे. भाजपाला काही सांगायचे असेल तर त्यांनी आमच्या योजनांमधील त्रुटी दाखवून द्याव्यात. केवळ भडकवण्याचे राजकारण केले जात आहे."

"भाजपाला जनतेला भडकावण्याचा अधिकार नाही. ज्यांनी कन्हैया कुमारची हत्या केली ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर अनेक खटले असून भाजपा नेत्यांनी त्यांना मदत केली. आज भाजपा वृत्तपत्रांतून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करत आहे. तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या काळात जयपूरमध्ये बॉम्बस्फोट झाले होते" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. 

लाल डायरीबद्दल अशोक गेहलोत म्हणाले की, "निवडणुका जिंकण्याचा हा भाजपचा डाव आहे. लाल डायरी प्रकरणात काय झाले याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. आजच्या घडीला भाजपाकडे निवडणुकीचा कोणताही मुद्दा नाही. राज्यात काँग्रेसविरोधी आणि सरकारविरोधी लाटेबाबत बोललं जात असताना मी तुम्हाला सांगतो की, तसं काही नाही."

"केरळप्रमाणेच राजस्थानमध्येही सरकारची पुनरावृत्ती होणार आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने आजपर्यंत जिंकू न शकलेल्या अनेक जागा यावेळी जिंकू. भाजपाला आमच्या कामात अडचण आहे, चिरंजीवी योजनेची अडचण आहे, Ops मध्ये अडचण आहे, नवीन जिल्हे निर्माण करण्यात अडचण आहे. राजस्थानची जनता भाजपाला धडा शिकवेल." 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाcongressकाँग्रेसRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक