शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

"भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती"; अशोक गेहलोतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 15:38 IST

अशोक गेहलोत यांनीही राजस्थानमधील छाप्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जयपूरमध्ये पत्रकार परिषदेत भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, "भाजपाला छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करायची होती. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेसाठी पूर्ण नियोजन करण्यात आले होते, पण त्यापूर्वीच त्याचा पर्दाफाश झाला. भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती."

अशोक गेहलोत यांनीही राजस्थानमधील छाप्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राजस्थानमध्ये इतके छापे टाकण्यात आले पण कोणत्या राजकीय नेत्याला अटक झाली का? असा सवाल त्यांनी केला. "आमच्या सरकारने खूप काम केलं आहे. भाजपाला काही सांगायचे असेल तर त्यांनी आमच्या योजनांमधील त्रुटी दाखवून द्याव्यात. केवळ भडकवण्याचे राजकारण केले जात आहे."

"भाजपाला जनतेला भडकावण्याचा अधिकार नाही. ज्यांनी कन्हैया कुमारची हत्या केली ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर अनेक खटले असून भाजपा नेत्यांनी त्यांना मदत केली. आज भाजपा वृत्तपत्रांतून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करत आहे. तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या काळात जयपूरमध्ये बॉम्बस्फोट झाले होते" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. 

लाल डायरीबद्दल अशोक गेहलोत म्हणाले की, "निवडणुका जिंकण्याचा हा भाजपचा डाव आहे. लाल डायरी प्रकरणात काय झाले याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. आजच्या घडीला भाजपाकडे निवडणुकीचा कोणताही मुद्दा नाही. राज्यात काँग्रेसविरोधी आणि सरकारविरोधी लाटेबाबत बोललं जात असताना मी तुम्हाला सांगतो की, तसं काही नाही."

"केरळप्रमाणेच राजस्थानमध्येही सरकारची पुनरावृत्ती होणार आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने आजपर्यंत जिंकू न शकलेल्या अनेक जागा यावेळी जिंकू. भाजपाला आमच्या कामात अडचण आहे, चिरंजीवी योजनेची अडचण आहे, Ops मध्ये अडचण आहे, नवीन जिल्हे निर्माण करण्यात अडचण आहे. राजस्थानची जनता भाजपाला धडा शिकवेल." 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाcongressकाँग्रेसRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक