शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

वन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 17:00 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: वन नेशन वन इलेक्शनसाठी विधी आयोगाला पत्र लिहिणाऱ्या भाजपानं आता यू-टर्न घेतला आहे. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याचा आमचा विचार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही एक देश आणि एक निवडणुकीची मागणीच केलेली नाही, असं म्हणत भाजपानं यावरुन सुरू असलेल्या चर्चांचं खंडन केलं आहे. 

विशेष म्हणजे खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'च्या मुद्दावरुन विधी आयोगाला पत्र लिहिलं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेतल्यास पैशांची बचत होईल. याशिवाय प्रशासनावरील ताणदेखील कमी होईल, असं शहांनी पत्रात म्हटलं होतं. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाऊ शकतात आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश असेल, असं वृत्त काल चर्चेत होतं. भाजपाकडून अनेकदा 'वन नेशन वन इलेक्शन'ची भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेसह 11 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अमित शहांनी विधी आयोगाला पत्र लिहिल्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज भाजपानं स्पष्टीकरण दिलं. 'लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्याचा आमचा विचार नाही. आम्ही तशी मागणीदेखील केलेली नाही,' अशा शब्दांमध्ये भाजपानं वन नेशन वन इलेक्शनवर सुरू असलेल्या चर्चेचं खंडन केलं आहे. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणं शक्य नसल्याचं आज सकाळीच निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. त्यानंतर आता भाजपानं याबद्दल स्पष्टीकरण देत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा विचार नसल्याचं म्हणत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी