शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

“मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का”; भाजप नेत्याची केंद्राला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 4:05 PM

India Vs Maldives Crisis: मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी गप्प बसतील की कारवाई करतील, अशी विचारणा भाजपच्या जेष्ठ नेत्याने केली आहे.

India Vs Maldives Crisis: गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारतात संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भारतीय सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सातत्याने लावून धरली आहे. तर दुसरीकडे भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू आहे. यावरून मालदीवमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे. यातच आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्राला घरचा आहेर देत मालदीवच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेणार, अशी विचारणा केली आहे. 

चीनवरून मायदेशी परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुइज्जू म्हणाले की, भले आम्ही लहान देश असू शकतो, असे असले म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा भारताकडे होता, असे म्हटले जात आहे. तसेच भारतीय सैन्य मालदीवमधून मागे घेण्याबाबत मुइज्जू यांनी पुन्हा एकदा तगादा लावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्राला थेट सवाल केला आहे. 

मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का?

चीनचा दौरा करून मायदेश परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारत सरकारला १५ मार्चपर्यंत मालदीवमधून भारतीय सैन्य परत बोलवा अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा, असा इशारा दिला आहे. कृतघ्न मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी मौन बाळगून गप्प बसतील की राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीवमध्ये लष्कर, वायूदल आणि नौदल घुसवून सत्तांतर घडवतील? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर केला आहे. 

दरम्यान, आधीच्या सरकारने भारताला विनंती करून मालदीवमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यास सांगितली होती. या विनंतीला मान देत, मालदीवरमधील सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीच्या बचाव कार्यासाठी भारतीय सैन्यदलाने आपली एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी भारतीय लष्कर माघारी बोलवावे, असा आग्रह धरला आहे. भारतीय लष्कराबाबत मालदीवने नोव्हेंबर २०२३ मध्ये एक निवेदन जारी केले होते. भारत आमच्या लोकशाही इच्छेचा आदर करेल आणि आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा आदेश देईल, अशी आम्हाला आशा आहे, असे या निवेदनात म्हटले होते. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीMaldivesमालदीव