शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

'भाजपने आमची 6 सरकारे चोरली...त्यांना चोर म्हणू का डाकू', काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 20:19 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर समाजाला तोडण्याचा आरोपही केला.

नवी दिल्ली: यावर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. यातच भारत जोडो यात्रेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला चोर आणि डाकू म्हणत सरकार चोरीचा आरोप केला.

भाजपने आमची सरकारे चोरलीकाँग्रेसची भारत जोडो यात्रा गुरुवारी पठाणकोटला पोहोचली. यावेळी खर्गे म्हणाले की, "भाजप सरकारने आमच्या पक्षातील अनेक लोकांना धमकावून पळवून नेले. त्यांनी देशभरातील आमची 6 सरकारे पाडून स्वतःची सरकारे स्थापन केली. आता आम्ही भाजपला चोर...डाकू म्हणावं की काय म्हणावं? लोकांनी काँग्रेस पक्ष निवडला, आम्हाला आशीर्वाद दिला, पण त्यांनी आमची सरकारे चोरली,'' असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

सभागृहात गोंधळ घालतातखर्गे पुढे म्हणतात की, ''जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संसदेत उभे राहतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने सभागृहावर प्रभाव टाकतात. जेव्हा आम्ही ऐकायला तयार असतो तेव्हा ते बोलत नाहीत. आम्ही बोलायला उभे राहतो, तेव्हा ते ऐकायला तयार नसतात. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ती 6 सरकारे चोरली. काहींना पैसे दिले, काहींना लालूच दाखवली, काहींना ईडी-इन्कम टॅक्सची भीती दाखवली,'' असंही खर्गे म्हणाले.

भाजपवाले समाजाला तोडत आहेतते पुढे म्हणाले की, ''राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला 125 दिवस पूर्ण झाले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुरू झालेली यात्रा देशातील जनतेला जोडणारी आहे. आज भाजप सरकार, आरएसएसचे लोक समाजाला तोडत आहेत. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या उणिवा लोकांना सांगण्यासाठीच राहुल गांधी आले आहेत. विशेषतः महागाई, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती याबाबत लोकांना माहिती देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत,'' असेही खर्गे म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे